- संविधान दिनानिमित्त केलं विधान; कोणीही न्यायालयात येण्यास घाबरू नये, असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी संविधान दिनानिमित्त देशाला संबोधित करताना, प्रत्येक नागरिकासाठी न्यायव्यवस्थेचे दरवाजे नेहमीच खुले असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, कोणीही न्यायालयात येण्यास घाबरू नये. लोकांची श्रद्धा हेच आपले श्रद्धास्थान आहे.The doors of the judiciary are always open to every citizen Chief Justice Chandrachud
सरन्यायाधीश म्हणाले की, येथे येणारे प्रत्येक प्रकरण हे संविधानाच्या नियमाचे उदाहरण आहे. राज्यघटनेने इतर वादांसोबत राजकीय वाद सोडविण्याचा अधिकारही दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे प्रतिक आहे की संविधानाने न्यायासाठी न्यायालयात पोहोचण्याचा अधिकारही दिला आहे.
सरन्यायाधीश म्हणाले की शुद्ध हवा आणि शुद्ध पाण्यासाठीही लोक सुप्रीम कोर्टात जातात. ते म्हणाले की, लोकांचा न्यायव्यवस्थेवर इतका विश्वास आहे की पोस्टकार्डच्या जमान्यातही ते सर्वोच्च न्यायालयाला न्याय मिळावा, अशी विनंती करणारी पत्रे लिहून समाधान मानत आहेत.
मीडिया रिपोर्ट्स याचे साक्षीदार आहेत. सरन्यायाधीश म्हणाले की, गेल्या वर्षी राष्ट्रपतींनी तुरुंगांमधील गर्दीवर चिंता व्यक्त केली होती. यावरही काम झाले. ते म्हणाले की आम्ही लवकरात लवकर कारागृह आणि ट्रायल कोर्टात आदेश पोहोचवण्याची व्यवस्था वेगवान केली आहे. याशिवाय अनेक वर्षे जुने तुरुंगाचे नियम दुरुस्त करण्यासाठी चाचणी केली जात आहे.
The doors of the judiciary are always open to every citizen Chief Justice Chandrachud
महत्वाच्या बातम्या
- Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झाले ७० टक्के मतदान
- शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!
- केरळच्या कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी; वार्षिक सोहळ्यात गर्दीमुळे गोंधळ
- ओटीटी प्लॅटफॉर्मवर लागू होणार सेन्सॉरशिप; यूट्यूबवरील पत्रकार, ब्लॉगर्स वृत्तवाहिन्याही कक्षेत येणार
- पाकिस्तानमध्ये 2 हिंदू मंदिरे पाडली; एक मंदिर युनेस्को वारसा यादीत; न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई