• Download App
    केजरीवालांच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला, मुख्यमंत्र्यांचे वकील म्हणाले- 'सर्वांना..'|The decision was reserved on Kejriwals plea

    केजरीवालांच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला, मुख्यमंत्र्यांचे वकील म्हणाले- ‘सर्वांना..’

    सध्या केजरीवाल यांच्या जामिनावर उच्च न्यायालयाचा निर्णय २९ जुलै रोजी येणार आहे.


    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली मद्य धोरणातील भ्रष्टाचाराशी संबंधित सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सध्या केजरीवाल यांच्या जामिनावर उच्च न्यायालयाचा निर्णय २९ जुलै रोजी येणार आहे.The decision was reserved on Kejriwals plea

    सुप्रीम कोर्टाने त्यांना ईडी प्रकरणात आधीच जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि विक्रम चौधरी उच्च न्यायालयात हजर झाले, तर सीबीआयच्या वतीने सरकारी वकील डीपी सिंग यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.



    केजरीवाल यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, ते मुख्यमंत्री आहेत, दहशतवादी नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत, मात्र सीबीआयने त्यांना अटक केलेली नाही. ईडी प्रकरणात ट्रायल कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करताच सीबीआयने त्यांना तत्काळ अटक केली.

    सर्वोच्च न्यायालयानेही केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला असून केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यानंतर ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला. ट्रायल कोर्टाचा निर्णय अगदी योग्य होता. केजरीवाल कुठेही पळत नसून त्यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांनी तपासात नेहमीच सहकार्य केले आहे.

    ते म्हणाले की, झोपेत असताना केजरीवाल यांच्या रक्तातील साखर पाच वेळा ५० च्या खाली गेली होती. हे चिंतेचे कारण आहे. झोपेत साखरेची पातळी कमी होणे धोकादायक आहे. या प्रकरणात सर्वांना जामीन मिळत आहे, माझ्या पक्षाचे नाव आम आदमी पार्टी आहे, मात्र मला जामीन मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. वस्तुस्थिती लक्षात घेऊन मला जामीन देण्यात यावा. अशी मागणी वकिलाने केजरीवालांच्या वतीने केली.

    The decision was reserved on Kejriwals plea

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न