• Download App
    काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल; छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव यांची स्पष्टोक्ती |The decision of the Congress High Command will have to wait; Chhattisgarh Minister T. S. Singhdev's outspokenness

    काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल; छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव यांची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था

    रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रभारी पदी निवड केल्यानंतर तसेच स्टार कॅम्पेनरच्या यादीत त्यांचे नाव टॉपला ठेवल्यानंतर छत्तीसगड मधील बंडखोर मंत्री टी. एस सिंगदेव यांनी सूचक विधान केले आहे.The decision of the Congress High Command will have to wait; Chhattisgarh Minister T. S. Singhdev’s outspokenness

    छत्तीसगडमधील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल, असे ते म्हणाले आहेत. गेले काही महिने छत्तीसगडमध्ये नेतृत्व प्रकरणाच्या बातम्या जोर धरून आहेत. भूपेश बघेल आणि सिंगदेव या दोघांचेही गट काँग्रेस हायकमांडला दोन-तीन वेळा भेटून आले आहेत.



    गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे सर्व आमदार पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. दोन्ही गटातील आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याच दरम्यान भूपेश बघेल यांची नियुक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी मुख्य प्रभारी म्हणून झाली आहे. लखीमपूरच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उत्तर प्रदेशचा दौराही करून घेतला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासमवेत ते दिवसभर होते.

    या राजकीय पार्श्वभूमीवर टी. एस. सिंगदेव यांनी हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल, असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेतृत्व बदला संबंधीचा निर्णय सोपा नसतो. हायकमांड सर्व नेत्यांची विचारविनिमय करून योग्य निर्णय घेत असते.

    आपल्याला हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल, असे सूचक विधान त्यांनी करून छत्तीसगडमधल्या संभाव्य राजकीय भूकंपाची चुणूक दाखविले दाखविल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    The decision of the Congress High Command will have to wait; Chhattisgarh Minister T. S. Singhdev’s outspokenness

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे