विशेष प्रतिनिधी
लखनौ: रविवारी दुपारी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 जणांवर खून, गुन्हेगारी कट आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहराइचमधील नानपारा येथील रहिवासी जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.The death toll in the region’s riots has risen to nine; Murder case against 14 people, including Union Home Minister’s son
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी सोमवारी सकाळी एका पत्रकाराचा मृतदेहही सापडला. यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा 9 वर गेला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी विरोधी नेत्यांना लखीमपूर खिरीला पोहोचू नये म्हणून नजरकैदेत ठेवले आहे. यामध्ये अखिलेश यादव, बसपा सरचिटणीस सतीश मिश्रा, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, आराधना मिश्रा आणि शिवपाल यादव यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे.
लखीमपूरला पोहोचलेल्या भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी, जोपर्यंत मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ केले जात नाही, त्यांच्या मुलाला अटक होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.
The death toll in the region’s riots has risen to nine; Murder case against 14 people, including Union Home Minister’s son
महत्त्वाच्या बातम्या
- वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय;
- लखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू
- Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका
- AARYAN KHAN DRUGS CASE : Cruise Party मध्ये आर्यन खानने केलं होत ड्रग्सचं सेवन NCB
- ‘शिक्षणोत्सव’ : ! आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; ‘माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी’ मुख्यमंत्री साधणार संवाद; वाचा शाळांसाठीची नियमावली