वृत्तसंस्था
भोपळ : परिवारवादी पक्ष म्हणजे नेमके काय? नेत्यांच्या मुलांना निवडणुकीची तिकिटे देण्याबाबत भाजपचे धोरण काय आहे? याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट खुलासे केले आहेत. नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायची नाहीत. त्यांना आधी संघटनेत काम करावे लागेल, असे नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.
नड्डा यांनी भोपळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढच्या वर्षीच्या निवडणुकीत तिकिटांची स्वप्ने पाहणाऱ्या नेत्यांच्या मुलांना मोठा धक्का दिला आहे. कोणत्याही नेत्याच्या मुलाला तिकीट मिळणार नाही. केंद्रीय संघटनेने केलेल्या धोरणानुसार तिकिटांचे वाटप केले जाईल, असेही ते म्हणाले.
भाजपने धोरण ठरवले आहे की एका व्यक्तीला एक काम द्यायचे आहे. हे केवळ विधानसभा निवडणुकीतच नाही, तर महापालिका निवडणुकीतही लागू होईल. यूपीचे उदाहरण देताना नड्डा म्हणाले की, तेथील अनेक खासदारांचे पुत्र चांगले काम करण्याचे दावेदार होते, पण त्यांना तिकीट दिले नाही. नेत्यांच्या मुलांनी सध्या संघटनेच्या कामात गुंतले पाहिजे, असे ते म्हणाले.
– घराणेशाहीची व्याख्या
नड्डा म्हणाले की, आपल्याला घराणेशाहीची संकल्पना समजून घ्यावी लागेल. वडील अध्यक्ष, मुलगा किंवा मुलगी सरचिटणीस. संसदीय मंडळात चाचा – ताया – ताई – जावई हा परिवारवाद आहे.
पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स (जम्मू आणि काश्मीर), लोक दल (हरियाणा), शिरोमणी अकाली दल (पंजाब), समाजवादी पार्टी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय जनता दल (बिहार), टीएमसी (पश्चिम बंगाल), डीएमके (तामिळनाडू), कर्नाटक कुमार स्वामींच्या पक्षात, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. हे सगळे पक्ष परिवारवादी आहेत. तेथे वडिलांच्या पश्चात मुलगा किंवा मुलगी, जावई जागा घेतात. भाजप आपल्या धोरणात असे करणार नाही.
– अधिकारी थेट मुख्यमंत्र्यांना का भेटतात?
कार्यक्रमानंतर नड्डा यांनी पक्ष कार्यालयात सुमारे अर्धा तास मंत्र्यांशी चर्चाही केली. अधिकारी थेट मुख्यमंत्र्यांना का भेटतात, असा सवाल त्यांनी केला. कोणताही विषय किंवा मुद्दा मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. अधिकारी का? ही परंपरा चांगली नाही. यावरून मंत्र्यांची कमजोरी दिसून येते, असे त्यांनी मंत्र्यांना सुनावले.
नड्डा म्हणाले की, मंत्र्यांनी आढावा घ्यावा, बैठका घ्याव्यात आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयांवर चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यातील दरीचा फायदा अधिकारी घेतात.
– गोळ्या झाडणारे शांत केले जात आहेत
नड्डा म्हणाले, की जम्मू-काश्मीरवर कोणीही गप्प बसलेले नाही. केंद्र सरकार कृती करत आहे. आता फक्त गोळ्या शांत होत नाहीत तर ती झाडणाऱ्याला शांत केले जाते. स्थानिक निवडणुका शांततेत पार पडल्याने नेत्यांची नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे.
The children of leaders have no tickets, but organizational work; J. P. Nadda’s outspokenness
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेस सर्वपक्षीय मंजूरी; केंद्र सरकारची भूमिका काय??
- महिलांच्या अधिकारावर ‘सुप्रीम’ निर्णय : कोर्टाने म्हटले- कुटुंबातील सदस्यांना आवडत नसले तरी स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही
- नेत्यांची गळती : जे निराश होते ते निघून गेले, खरे लढणारे काँग्रेसमध्येच!!; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
- सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार??