• Download App
    'तेलंगणात भाजपचा मुख्यमंत्री मागासवर्गीय असेल', मतदानापूर्वी पीयूष गोयल यांचा विजयाचा दावा!|The Chief Minister of BJP in Telangana will be a backward class Piyush Goyals claim of victory before the polls

    ‘तेलंगणात भाजपचा मुख्यमंत्री मागासवर्गीय असेल’, मतदानापूर्वी पीयूष गोयल यांचा विजयाचा दावा!

    • तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे

    विशेष प्रतिनिधी

    वारंगल : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. दरम्यान मतदानापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी तेलंगणात भाजपच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे.The Chief Minister of BJP in Telangana will be a backward class Piyush Goyals claim of victory before the polls

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार आहे. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास मागास समाजातील नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री करण्यात येईल.



    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पीयूष गोयल यांनी तेलंगणा सरकारवरही निशाणा साधला. भाजप सत्तेवर आल्यास राज्यातील भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण आणि घराणेशाही संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की, वारंगलमध्ये मला ज्या प्रकारचा प्रतिसाद दिसत आहे, त्यावरून मला खात्री आहे की, येथील सर्व जागा भाजप जिंकणार आहे. तसेच भाजपचे सरकार येताच राज्याची कमान मागास समाजाच्या नेत्याकडे देण्यात येईल, असे ते म्हणाले. तेलंगणात भाजपचा विजय होईल आणि डबल इंजिनचे सरकार राज्याच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले . बीआरएस आणि काँग्रेसचा पराभव करून भाजप येथे सरकार स्थापन करेल, असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.

    The Chief Minister of BJP in Telangana will be a backward class Piyush Goyals claim of victory before the polls

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे