महाराष्ट्रात फडणवीस सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधी मोर्चात एकत्र येण्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली. ती त्यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी केली. हिंदी सक्ती विरोधी मोर्चा 5 जुलै 2025 रोजी मुंबईत निघणार आहे. संजय राऊत यांनी आज 27 जून 2025 रोजी यासंदर्भात ट्विट केले. त्यानंतर नियमित पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी “राजकीय क्रांती” झाल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली.
प्रत्यक्षात 27 जून आणि 5 जुलै यामध्ये 9 दिवसांचा कालावधी आहे हे सत्य मराठी माध्यमे विसरली.
एकमेकांना टाळी देण्याच्या चर्चेतून ठाकरे बंधूंच्या ऐक्याची चर्चा सुरू झाली होती. चर्चेने बरीच वळणे घेतली. दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्ते ठाकरे बंधूंच्या ऐक्याविषयी उत्सुक होते. काहींनी निवडक नेतेच हितसंबंध दुखावल्यामुळे या ऐक्याच्या विरोधात होते. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हॉटेल ताज मध्ये भेटले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेस अर्धविराम मिळाला. परंतु, आता या सगळ्या चर्चांना आज तरी पूर्णविराम देऊन दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्ती विरोधाच्या मोर्चात एकत्र असतील, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या आतापर्यंतची राजकीय वर्तणूक आणि संजय राऊत यांचे ठाकरे आणि पवार यांच्याकडे असलेली परस्परविरोधी उठबस यामुळे एकूणच ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या जाहीर घोषणेविषयी संशय निर्माण झाला.
– उद्धव ठाकरे यांचा इतिहास
कारण उद्धव ठाकरे यांनी आत्तापर्यंत जाहीरपणे घेतलेली भूमिका आणि प्रत्यक्षात केलेली राजकीय वर्तणूक यामध्ये तफावत असल्याचा इतिहास आहे.
2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जाहीरपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असे सांगत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे महायुतीमध्ये होते. ते मोदी आणि शाह यांच्याबरोबर स्टेजवर बसत होते. मोदी आणि शाह बोलतील त्याला ते माना डोलवत होते. पण महायुतीच्या बाजूने निकाल लागून देखील उद्धव ठाकरे नंतर 360° मध्ये फिरले. त्यांनी महायुतीतून बाजूला होऊन शरद पवार आणि काँग्रेस यांच्याशी हात मिळवणी केली. ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. हे सगळे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत करून दाखविले होते. त्यावेळी ठाकरे आणि पवार यांच्या असले “संपर्क दूत” संजय राऊत हेच होते.
– संपर्क दूताचा धोका
आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले “संपर्क दूत” संजय राऊतच आहेत. हिंदी सक्तीविरोधातल्या मोर्चा ठाकरे बंधू एकत्र येतील अशी घोषणा संजय राऊत यांनीच केली आहे. पण घोषणेचा दिवस 27 जून 2025 आणि मोर्चाचा दिवस पाच जुलै 2000 2025 यात 9 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत नेमके काय घडणार??, भाजप कोणती भूमिका घेणार??, ठाकरे बंधूंचे ऐक्य तोडण्यासाठी फडणवीस कोणत्या चाली खेळणार??, आशिष शेलार यांना ते कसे पुढे करणार?? आशिष शेलार आणि शरद पवार हे एकत्र येऊन कोणती “गेम” खेळणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण ठाकरे बंधूंचे ऐक्य हे शिवसैनिक आणि मनसैनिक यांचे स्वप्न असले आणि ठाकरे ब्रँडच्या विशिष्ट अस्तित्वासाठी आवश्यक असले, तरी ते ऐक्य होणे किंवा न होणे हे फक्त ठाकरे बंधूंच्या हातात उरलेले नाही. त्याची सूत्रे भाजप आणि शरद पवार यांच्या हातात आहेत. उद्धव ठाकरेंनी अनावश्यक अडेल भूमिका घेऊन भाजपशी वैर साधले. त्याचा लाभ पवारांनी उठवला. राज ठाकरे मर्यादे पलीकडे संघटना वाढवू शकले नाहीत. त्यांचे नेहमी तळ्यात मळ्यात राहिले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या हातातली ऐक्याची सूत्रे निसटली आणि मधल्या मध्ये भाजप प्रबळ झाला. पवारांना लुडबुड करायची संधी मिळाली. म्हणून आता ठाकरे बंधूंच्या इतक्यात अजून 9 दिवस बाकी आहेत. कालावधीत नेमके काय घडेल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Thakckrey brothers will come together in against compulsory Hindi morcha
महत्वाच्या बातम्या
- Ahmedabad Air India : अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा सगळाच उलगडा होणार ; ब्लॅक बॉक्स डेटाचा डाउनलोड!
- Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??
- Yogi government : योगी सरकार ‘सपा’ खासदाराशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटू रिंकू सिंगला देणार सरकारी नोकरी
- Mumbai : मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर अटक