• Download App
    Manipur मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मानंतर तणाव कायम!

    Manipur : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मानंतर तणाव कायम!

    Manipur

    केंद्राने सीआरपीएफच्या आणखी 20 कंपन्या पाठवल्या


    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ : Manipur मणिपूरमध्ये गेल्या वर्षी उसळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. ताजे हल्ले आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राने 20 अतिरिक्त CAPF कंपन्या राज्यात पाठवल्या आहेत ज्यात सुमारे 2,000 कर्मचारी आहेत.Manipur

    सूत्रांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री या तुकड्या विमानाने आणण्याचे आणि तत्काळ तैनात करण्याचे आदेश जारी केले. सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सोबत झालेल्या भीषण चकमकीत किमान 10 संशयित दहशतवादी मारले गेले.



    जिरीबाम जिल्ह्यातील जाकुरधोर येथे गणवेश परिधान केलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज झालेल्या अतिरेक्यांनी बोरोबेकरा पोलिस स्टेशन आणि लगतच्या CRPF कॅम्पवर अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा ही चकमक झाली. या भीषण चकमकीनंतर दलाने अत्याधुनिक शस्त्रांचा मोठा साठाही जप्त केला.

    Tensions remain in Manipur after the elimination of terrorists

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट