विशेष प्रतिनिधी
कोहिमा – सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारामध्ये तेरा निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर नागालँडमध्ये असंतोष धुमसू लागला आहे. पोलिसांनी लष्कराच्या २१ व्या पॅरा स्पेशल फोर्सविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून लष्कराने देखील या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.Tense atmosphere in Nagaland
दरम्यान लष्कराच्या गोळीबारामध्ये नेमके किती लोक मरण पावले याबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे. आदिवासींच्या कोनयाक युनियनने दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारामध्ये सतराजण ठार झाल्याचा दावा करण्यात आला होती पण नंतर हा आकडा १४ करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी मात्र या गोळीबारामध्ये चौदाजण ठार झाल्याचा दावा केला आहे.
या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी विविध आदिवासी संघटना, नागरी हक्क आणि विद्यार्थी संघटना यांनी सोमवारी बंदचे आवाहन केले होते. या भागातील सर्वांत प्रभावशाली संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागा स्टुडंट फेडरेशनने (एनएसएफ) पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
स्थानिकांनी या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या गोळीबारामध्ये २८ जण जखमी झाले असून अन्य सहा गंभीर जखमींवर सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
Tense atmosphere in Nagaland
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात
- वयाच्या सत्तरीतही गुडघ्याला बांधले बाशिंग, जाहिरातीनंतर इच्छुक वधुंच्या प्रस्तावाचा पाऊस
- रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले
- महाराष्ट्रातील सहकारी बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेची कारवाई, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही