विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : क्रिकेट वर्ल्ड कपच्या सलग 10 सामन्यांमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवून खेळ केलेल्या भारतीय टीमला फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू दाटले. ते पाहून 140 कोटी जनतेच्या डोळ्यातही अश्रू आले. भारताच्या पराभवामुळे संपूर्ण देशभर रविवारी रात्री सन्नाटा होता. Tears in Rohit’s eyes, silence across India; Prime Minister Modi’s morale-boosting tweet
पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय टीमच्या कामगिरीचे कौतुक करणारे आणि समस्त भारतीयांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ट्विट केले आहे.
संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमने अतिशय प्रतिभाशाली खेळ दाखवत विजयी वाटचाल चालू ठेवली होती. अत्यंत खिलाडू वृत्तीने तुम्ही सर्व सामने खेळतात आणि विजयी झालात. भारताला तुम्ही गौरव मिळवून दिलात. आम्ही सर्व भारतीय आज आणि सदैव भारत टीमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास देणारे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय टीमने सलग दहा सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला होता. परंतु फायनल मध्ये आपली फारशी चमक टीमला दाखवत आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियन टीमचे अभिनंदन केलेच आहे, पण त्याच वेळी भारतीय टीमचे देखील खास कौतुक करून त्यांच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचा विश्वासही समस्त भारतवासीयांना दिला आहे.
Tears in Rohit’s eyes, silence across India; Prime Minister Modi’s morale-boosting tweet
महत्वाच्या बातम्या
- ‘IDF’ने घेतला बदला! जर्मन-इस्रायली तरुणीला जीपमधून नग्न फिरवणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला केले ठार
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा महामुकाबला!
- योगींच्या उत्तर प्रदेशात हलाल उत्पादन साठवणूक आणि विक्रीवर संपूर्ण बंदी!!
- इस्रायलने पुन्हा हमासच्या गैरकृत्यांचे पुरावे दिले, गाझा शाळेत ठेवलेल्या रॉकेट लॉन्चरचा व्हिडिओ जारी