• Download App
    तामिळनाडू : फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमीTamil Nadu  Six dead several injured in an explosion at a firecracker warehouse in Kuruvimalai village of Kancheepuram district

    तामिळनाडू : फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी

    तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील कुरुविमलाई गावात आज फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा ठार, अनेक जखमी झाले आहेत. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळीची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या होत्या.  यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. Tamil Nadu  Six dead several injured in an explosion at a firecracker warehouse in Kuruvimalai village of Kancheepuram district

    करोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय आढावा बैठक

    जखमी लोकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अशी माहिती कांचीपुरमच्या जिल्हाधिकारी एम आरती यांनी म्हटलं आहे. याशिवाय लवकरच याप्रकरणी मोठी कारवाई केली जाईल. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही सांगितले आहे. अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर पोलीस कारवाई करणार आहेत.

    मार्चमध्येही घडली होती दुर्घटना –

    मार्चमध्ये कुड्डालोर जिल्ह्यातील शिवनारपुरम गावात फटाक्यांच्या शेडला आग लागली होती. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले होते. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

    Tamil Nadu  Six dead several injured in an explosion at a firecracker warehouse in Kuruvimalai village of Kancheepuram district

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे