वृत्तसंस्था
काबूल : भारताबरोबर चांगले व मजबूत संबंध प्रस्थापित व्हावे, अशी तालिबानची इच्छा असल्याचे या संघटनेचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले. Taliban will maintain good relations with India
भारताचे राजनैतिक अधिकारी येथे एकदम सुरक्षित राहू शकतील. कोणालाही नव्या राजवटीला घाबरण्याचे व देश सोडण्याची गरज नाही, असेही तो म्हणाला.
भारताबरोबर तालिबानला चांगले संबंध हवे आहेत, त्याचबरोबर भारत-पाकिस्तानमधील वादात हस्तक्षेप न करणार नसल्याची भूमिका त्याने मांडली.
या दोन्ही देशांमधील संबंध आहेत, या त्यांच्या आपसांतील प्रश्न आहे.
तालिबान यात लक्ष घालणार नाही, असे मुजाहिदने सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने अफगाणिस्तानच्या भवितव्याबाबत काही मुद्दे मांडले. तालिबानी सत्तेतही महिलांना शिकण्याची संधी दिली जाईल. त्या घराबाहेर पडून कामही करू शकतील. फक्त एकच अट आहे ती म्हणजे शरिया कायद्याचे त्यांनी कठोर पालन केले पाहिजे. तसेच त्यांनी हिजाब घालणे अनिवार्य आहे, असे सांगण्यात आले.
Taliban will maintain good relations with India
महत्वाच्या बातम्या
- फाशी दिलेल्या हजारा नेत्याचा पुतळा तालिबानी दहशतवाद्यांकडून उद्वस्त, महिला गव्हर्नरही ताब्यात
- लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मुलीचा विनयभंग, ४०० जणांविरोधात गुन्हा
- धोकेबाज पाकिस्तानला हाताळण्यात अमेरिकेला अपयश, दहशतवादी तालिबानला फायदा
- महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे सर्वत्र संताप, दिल्लीत भाजपची पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने