विशेष प्रतिनिधी
जयपूर: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान संपूर्ण जगात सध्या चर्चेत आहे. परंतु, राजस्थानातील जैसलमर जिल्ह्यातील एका गावातील क्रिकेट स्पर्धेत चक्क तालीबानचा संघ सहभागी झाला होता. या नावामुळे गावात वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे या गावात अल्पसंख्यांक समाजाचे वर्चस्व असून हा परिसर संवेदनशील मानला जातो. Taliban cricket team playing in Rajasthan, type in border Jaisalmer district
जैसलमेर जिल्ह्यातील भानियाना गावात क्रिकेट स्पर्धा सुरू होती. त्यामध्ये तालिबान नावाच्या संघाने स्पर्धेत भाग घेतला. सामरिकदृष्टया महत्वाच्या असलेल्या आणि पोखरणपासून केवळ ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात त्यामुळे वाद निर्माण झाला. ज्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पोखरणपासून 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात वाद निर्माण झाला. पोखरण फायरिंग रेंज जवळच असल्याने हा परिसर संवेदनशील मानला जातो आणि तेथे सैन्याच्या हालचाली नियमितपणे होत राहतात.
क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की, ‘तालिबान’ नावाचा संघ चुकून समाविष्ट करण्यात आला होता आणि हा संघ स्पर्धेतून काढून टाकण्यात आला आहे. पहिल्या सामन्यानंतर संघ काढून टाकण्यात आला आणि त्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. आयोजक आणि ग्रामस्थांच्या वतीने ते दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून पुन्ह अशी गोष्ट होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Taliban cricket team playing in Rajasthan, type in border Jaisalmer district
महत्त्वाच्या बातम्या
- घसरलेली जीभ आणि उगारलेले हात…!!
- ममता बॅनर्जी केंद्राविरोधात आक्रस्ताळ्या उड्या मारत राहणार…?? की उद्धव ठाकरे यांची “वाट” पकडणार…??
- दिशा सालियनच्या मारेकरी मंत्र्याला आत मध्ये घालू; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची नाव न घेता उघड धमकी
- पुण्यामध्ये पोटच्या दोन मुलांकडून आईचा छळ; कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा धक्कादायक प्रकार