विशेष प्रतिनिधी
मुंबई : जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट म्हणून बोलतात तेव्हा जगभरातील लोकांना भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरी करण्यास प्रोत्साहीत करत आहात. अशा प्रकारे एका विशिष्ट जातीला लक्ष्य करणे हे सौम्य दहशतवाद आहे. वीर दास विरोधात कठोर करवाई झालीच पाहिजे अशी मागणी अभिनेत्री कंगना रनौटने केली आहे.Take stern action against Veer Das, targeting specific castes, mild terrorism, Kangana Ranauts demand
अभिनेता आणि कॉमेडियन वीर वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. एवढचं काय तर सोशल मीडियावर अनेकांनी त्याने भारताचा अपमान केल्याचे म्हटले आहे. यावर आता अभिनेत्री कंगना रणौतने वीर दासवर टीका केली आहे.
कंगनाने याबाबत लिहिलेल्या इन्स्ट्राग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, बंगालमध्ये झालेल्या दुष्काळानंतर चर्चिल म्हणाल होते की हे भारतीय सशांसारखे आहेत आणि ते असेच मरणार आहेत.भारतात भुकेमुळे होणाºया लाखो लोकांच्या मृत्युसाठी त्यांनी भारतीयांच्या लैंगिक इच्छा/प्रजनन क्षमता दोषी असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारे एका विशिष्ट जातीला लक्ष्य करणे हे सौम्य दहशतवाद आहे.
सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचे आणि कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे.
वीर दासने म्हटले आहे की, मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निदेर्शांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाºया शेतकºयांवर धावून जातो.
Take stern action against Veer Das, targeting specific castes, mild terrorism, Kangana Ranauts demand
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी