- तुम्ही लोक एकमेकांवर आरोप करत आहात, मात्र हे राजकीय युद्धाचे मैदान नाही. असंही न्यायालयाने म्हटलं आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत टीका केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे.
न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आणि सांगितले की, पंजाबमध्ये अजूनही पराळी जळत आहेत. तुम्ही लोक एकमेकांवर आरोप करत आहात, हे राजकीय युद्धाचे मैदान नाही. तुम्ही ते कसे करता हे आम्हाला माहीत नाही, हा तुमचा प्रश्न आहे, पण हे थांबलच पाहिजे.Supreme Courts strict stance on increasing pollution in Delhi NCR
वाढत्या वायू प्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी नाराजी व्यक्त करत दिल्लीत दरवर्षी ही समस्या सुरू होते, असे सांगितले.
पराळी जाळल्यामुळे वायू प्रदूषण वाढू लागते. पंजाबमध्ये अजूनही पराळी जाळले जात आहे. हे थांबवल्याशिवाय प्रदूषणाची पातळी कमी होणार नाही. न्यायमूर्ती कौल म्हणाले की प्रत्येकजण येथे समस्या मोजण्यासाठी येतो. पण उपायांवर चर्चा करत नाही. दिल्लीत वायू प्रदूषणामुळे किती मुले आजारी पडत आहेत हे तुम्ही पाहत आहात.
Supreme Courts strict stance on increasing pollution in Delhi NCR
महत्वाच्या बातम्या
- ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपाचं! – ग्रामपंचायत निवडणुक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ग्रामपंचायत निकालाची फायनल आकडेवारी; भाजप नंबर 1 ही नेहमीची बातमी; पवार – ठाकरेंचे गारुड उतरले ही खरी बातमी!!
- महाराष्ट्रात आता ठाकरे – पवारांमध्ये राजकी चुरस; पण ती पहिल्या – दुसऱ्या क्रमांकासाठी नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी!!
- शुबमन गिल-सारा तेंडुलकरच्या डेटिंगवर सारा अली खानने केलं शिक्कामोर्तब!