बांगलादेशातील सत्तापालटावरून दिला आहे सूचक इशारा!
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बांगलादेशात हिंसाचार सुरूच आहे. लाखो आंदोलकांनी आरक्षणाच्या नावाखाली हिंसक वृत्ती स्वीकारली. शेख हसीना देश सोडून गेल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी ( Subhendu Adhikari )यांनी सोमवारी (5 ऑगस्ट) मोठे विधान केले आहे. शुभेंदू अधिकारी म्हणाले, “काही दिवसांत एक कोटी हिंदू निर्वासित पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयार राहावे.’
पश्चिम बंगाल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, “बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे. रंगपूर येथे नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली. सिराजगंज पोलिस ठाण्यात 13 पोलिसांची हत्या करण्यात आली होती. यापैकी ९ हिंदू आहेत. त्याचवेळी नोआखलीमध्ये हिंदूंची घरे जाळण्यात आली. मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांना या प्रकरणी भारत सरकारशी त्वरित बोलण्यास सांगेन.’
सीएएचा संदर्भ देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, “सीएएमध्ये हे स्पष्ट आहे की जर एखाद्याला धार्मिक छळामुळे मारहाण झाली, तर आपला देश पुढे येऊन या प्रकरणांची चौकशी करेल. मी तुम्हाला सांगतोय की जर ही परिस्थिती तीन दिवसांत आटोक्यात आली नाही तर बांगलादेश जमात आणि कट्टरवाद्यांच्या हातात जाईल. बांगलादेशातील हिंसाचारात मृतांचा आकडा 300 वर पोहोचला आहे हे तुम्हाला माहीत असेल. आरक्षण सुधारण्याच्या मागणीने सुरू झालेल्या आंदोलनाचे सरकार बदलण्याच्या आंदोलनात रूपांतर झाल्याचे ते म्हणाले.
बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शक आणि सरकार समर्थकांमध्ये जोरदार चकमक झाली. दोन गटांतील संघर्षात आतापर्यंत 300 जणांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. मारले गेलेले बहुतांश पोलीस आहेत, ज्यांच्यावर आंदोलकांचा राग वाढत आहे. यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाणे, पोलीस चौकी, सत्ताधारी पक्षाची कार्यालये आणि त्यांच्या नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ला केला आणि अनेक वाहने पेटवून दिली.
Subhendu Adhikari
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : ट्रान्सजेंडर-सेक्स वर्कर्स रक्तदान प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस; रक्तदानावर बंदी हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन
- Devendra Fadnavis : चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळातच आला; देशमुखांच्या दाव्यातली फडणवीसांनी काढली हवा!!
- Wayanad Landslides : वायनाड भूस्खलन- मृतांची संख्या 365 वर, 206 बेपत्ता; उद्ध्वस्त घरांमधून चोरी; मुख्यमंत्री म्हणाले- पुनर्वसनासाठी टाऊनशिप
- Samajwadi party : अयोध्येतले बलात्कार प्रकरण समाजवादी पार्टीच्या अंगलट; आधी झाकण्याचा डाव; पण आता न्यायाची मागणी!!