• Download App
    देशभरातील विद्यार्थ्यांचे चांगल्या संशोध संस्थांकडे अक्षम्य दुर्लक्ष|Students not interested in Research

    देशभरातील विद्यार्थ्यांचे चांगल्या संशोधन संस्थांकडे अक्षम्य दुर्लक्ष

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – देशातील ९० टक्के विद्यार्थी हे संशोधनाला फारसे प्रोत्साहन न देणाऱ्या महाविद्यालये आणि विद्यापीठांची निवड करतात, अशी खंत केंद्र सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार के. विजयराघवन यांनी व्यक्त केली.Students not interested in Research

    विजयराघवन म्हणाले,‘‘ देशात संशोधनासाठी प्रचंड संधी आणि पर्याय उपलब्ध आहेत. जैवतंत्रज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, कृषी संशोधन परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषद, अणुऊर्जा विभाग अशा सर्व ठिकाणी संशोधनाला मोठा वाव आहे.



    या संस्थांमध्ये सर्व प्रकारचे स्रोत आणि क्षमता उपलब्ध आहे. याबरोबरच देशात ७० ते ७५ केंद्रीय विद्यापीठे आणि शेकडो इतर विद्यापीठे आहेत. ज्या संशोधन संस्थांना ९० टक्के पाठबळ मिळते, त्या संस्थांमध्ये केवळ १० टक्केच विद्यार्थी प्रवेश घेतात

    जिथे कमी प्रमाणात संशोधन होते, अशाच संस्थांमध्ये ९० टक्के विद्यार्थी प्रवेश घेतात. चांगल्या संशोधन संस्था हाकेच्या अंतरावर असतानाही विद्यार्थ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते.’’सर्व शिक्षण संस्थांनी समन्वयाने काम केल्यास चांगल्या प्रयोगशाळांचे जाळे शिक्षण क्षेत्र आणि उद्योगांना उपलब्ध होऊ शकते, असा सल्ला विजयराघवन यांनी दिला.

    Students not interested in Research

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते