• Download App
    ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थीनीचा छळ, कंटाळून विष प्राशन करून केली आत्महत्या|Student persecuted for refusing to convert to Christianity, Suicide by poisoning

    ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थीनीचा छळ, कंटाळून विष प्राशन करून केली आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्रास दिल्याने कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली. तामीळनाडूतील भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषदेने धर्मांतराच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करून याबाबत एक व्हिडीओ प्रसारित केला आहे.Student persecuted for refusing to convert to Christianity, Suicide by poisoning

    बारावीच्या या मुलीने शाळेच्या वसतिगृहात कीटकनाशक प्राशन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या शाळेतील विद्यार्थी आणि मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने सात जानेवारी रोजी शाळेकडेअरियालूर जिल्ह्यात घरी जाण्यासाठी शाळेकडे परवानगी मागितली होती.



    शाळेच्या अधिकाºयांनी १० जानेवारी रोजी घरी जाण्याची परवानगी नाकारली. इतर विद्यार्थी मात्र पोंगल सणासाठी घरी गेले होते. त्यामुळे या मुलीने कीटकनाशक प्राशन केले. दुसऱ्या दिवशी, ती घरी गेली आणि पोटदुखीची तक्रार केल्यानंतर 11 जानेवारी रोजी तिला घराजवळील स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले. तिला औषध दिले आणि ती त्याच दिवशी घरी परतली.

    15 जानेवारी रोजी, वेदना वाढत गेली आणि तिला तंजावर वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तपासणीत तिच्या यकृताला गंभीर नुकसान झाल्याचे आढळले. बुधवारी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. शाळेकडून या मुलीला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यासाठी तिचा छळही केला जात होता. त्यामुळे तिने किटकनाशक प्राशन केले.

    Student persecuted for refusing to convert to Christianity, Suicide by poisoning

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे