• Download App
    Tirupati तिरुपतीत चेंगराचेंगरी, 4 जणांचा मृत्यू; तिकिट बुकिंग काउंटरवर टोकनसाठी 4 हजार लोक होते रांगेत

    Tirupati तिरुपतीत चेंगराचेंगरी, 4 जणांचा मृत्यू; तिकिट बुकिंग काउंटरवर टोकनसाठी 4 हजार लोक होते रांगेत

    वृत्तसंस्था

    तिरुपती : Tirupati आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार ६ भााविकांच्या मृत्यूचा दावा केला जात आहे. Tirupati

    प्रत्यक्षात चार हजारांहून अधिक भाविक काउंटरजवळ रांगेत उभे होते. त्याचवेळी बैरागी पट्टिडा पार्कवर भाविकांना रांगा लावण्यास सांगण्यात आले. पुढे जाण्याच्या शर्यतीत गोंधळ उडाला. लोक एकमेकांवर चढले. यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनेवर दुःख व्यक्तक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती घेतली व घटनास्थळावर मदतीच्या सूचना केल्या. जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळतील. ते गुरूवारी तिरूपतीला जाऊन जखमींची भेट घेतील. Tirupati

    ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते गेट 10 जानेवारीला उघडण्यात येणार होते. एक दिवस आधी मंगळवारी तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ दरवाजे 10 ते 19 जानेवारीदरम्यान दर्शनासाठी उघडले जातील, असे सांगितले होते. त्यासाठी टोकन घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते.

    तिरुपती भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे आंध्र प्रदेशातील शेषाचलम पर्वतावर वसलेले आहे. भगवान वेंकटेश्वराचे हे मंदिर तोंडमन राजाने बांधले होते. 11 व्या शतकात रामानुजाचार्य यांनी मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली होती.

    असे मानले जाते की जेव्हा भगवान व्यंकटेश्वर पद्मावतीसोबत लग्नाची योजना आखत होते तेव्हा त्यांनी संपत्तीचा देव कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले होते. देवाचे अजूनही ते कर्ज आहे आणि भक्त त्याला त्यावरील व्याज भरण्यास मदत करण्यासाठी देणगी देतात. तिरुमला मंदिराला दरवर्षी सुमारे एक टन सोने दान म्हणून मिळते.

    तिरुपतीला जाणाऱ्या सर्व भाविकांना येथील प्रसिद्ध लाडू प्रसाद म्हणून दिला जातो. येथे दररोज सुमारे 3 लाख लाडू बनवले जातात. बेसन, लोणी, साखर, काजू, बेदाणे आणि वेलची यापासून लाडू बनवले जातात आणि त्याची रेसिपी सुमारे 300 वर्षे जुनी आहे. Tirupati

    येथे केसांचे दान केले जाते, असे मानले जाते की जो मनुष्य आपल्या मनातील सर्व पाप आणि दुष्कृत्ये येथे सोडतो, देवी लक्ष्मी त्याचे सर्व दुःख दूर करते. म्हणून येथे लोक त्यांचे केस त्यांच्या सर्व वाईट आणि पापांचे प्रतीक म्हणून सोडतात. भगवान विष्णूला व्यंकटेश्वर म्हणतात, हे मंदिर मेरू पर्वताच्या सात शिखरांवर बांधलेले आहे, त्याची सात शिखरे शेषनागाच्या सात कुंड्यांचे प्रतीक आहेत. या शिखरांना शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृष्टाद्री, नारायणद्री आणि व्यंकटाद्री असे म्हणतात.

    यापैकी भगवान विष्णू व्यंकटाद्री नावाच्या शिखरावर विराजमान आहेत म्हणून त्यांना व्यंकटेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरात दिवसातून तीन वेळा बालाजीचे दर्शन होते. पहाटे होणाऱ्या पहिल्या दर्शनाला विश्वरूप म्हणतात. दुसरे दर्शन दुपारी आणि तिसरे दर्शन रात्री होते. भगवान बालाजीचे संपूर्ण मूर्ती शुक्रवारी सकाळी अभिषेकच्या वेळीच पाहता येते.

    येथेच भगवान बालाजींनी रामानुजाचार्यांना साक्षात दर्शन दिले होते, बालाजीच्या मंदिराशिवाय येथे आकाश गंगा, पापनाशक तीर्थ, वैकुंठ तीर्थ, जलवितीर्थ, तिरुचनूर अशी अनेक मंदिरे आहेत. ही सर्व ठिकाणे देवाच्या लीलेशी संबंधित आहेत. असे म्हटले जाते की श्री रामानुजाचार्यजी सुमारे दीडशे वर्षे जगले आणि त्यांनी आयुष्यभर भगवान विष्णूंची सेवा केली, ज्याचा परिणाम म्हणून येथे देवाने त्यांना साक्षात दर्शन दिले.

    Stampede in Tirupati, 4 people died

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ECI’s : दिल्ली-महाराष्ट्रासह 23 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR ची घोषणा; एप्रिलपासून प्रक्रिया सुरू होईल

    Tarique Rahman : बांगलादेशी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप

    Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या 37 जागांवर 16 मार्च रोजी निवडणूक; यापैकी 25 जागा विरोधकांच्या, एनडीएच्या 12