वृत्तसंस्था
श्रीनगर : तब्बल तीन वर्षांनंतर ईदनिमित्त भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी सीमेवर मिठाईची देवाणघेवाण केली. २०१९ नंतर प्रथमच हा असा कार्यक्रम पार पडला. Soldjers exchange sweets
ईदनिमित्त असा कार्यक्रम सीमेवरील उभय देशांच्या सैनिकांमधील मुख्य उत्सव मानला जातो. २०१९ मध्ये पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यानंतर गेली दोन वर्षे हा कार्यक्रम झाला नव्हता.
यंदा फेब्रुवारीपासून उभय देशांच्या सैनिकांनी शस्त्रसंधीच्या कराराचे काटेकोर पालन केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील कृष्णगंगा नदीच्या किनाऱ्यावरील तिथवाल क्रॉसिंग, उडी येथील कमान अमन सेतू आणि पूँच-रावळकोट क्रॉसिंग पॉइंट येथे हे कार्यक्रम पार पडले. त्यावेळी उभय देशांच्या सैनिकांनी त्यांचे राष्ट्रध्वजही बरोबर आणले होते.
Soldjers exchange sweets
महत्त्वाच्या बातम्या
- माणसाला बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका तसा कमीच, घाबरून न जाण्याचे डॉक्टराचे आवाहन
- राजस्थानात दरोडेखोरांनी पळविली चक्क पोलिस निरीक्षकाचीच मोटार, भाजपची गेहलोत सरकारवर टीका
- उत्तर प्रदेशात आता चक्क फुलनदेवीचे १८ पुतळे उभारले जाणार
- नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला
- ड्रोन उड्डाणांवर वेस्टर्न नेव्ही कमांडची कठोर भूमिका, 3 किमी रेंजमध्ये आलेले ड्रोन होणार नष्ट
- Corona Cases in india : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 40 हजारांहून जास्त नवे रुग्ण, 4 हजार रुग्णांचा मृत्यू
- Eid-ul-Adha : राष्ट्रपती – पंतप्रधानांनी दिल्या ईद-उल-अधाच्या शुभेच्छा, सद्भाव, प्रेम आणि त्यागाची केली कामना