• Download App
    आसाममध्ये याच महिन्यापासून होणार सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण; राज्यातील 70 लाख मियां मुस्लिमांची तपासणी; यांना परदेशी मानते सरकार|Socio-Economic Survey to be held in Assam from this month; Examination of 70 lakh Mian Muslims in the state; The government considers them foreigners

    आसाममध्ये याच महिन्यापासून होणार सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण; राज्यातील 70 लाख मियां मुस्लिमांची तपासणी; यांना परदेशी मानते सरकार

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : आसाममध्ये राहत असलेले सुमारे 70 लाख ‘मियां’ (बंगाली भाषिक) मुस्लिम तणावाखाली आहेत. वास्तविक आसाम सरकारने मूळ आसामी मुस्लिमांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्याची घोषणा केली असून त्यांना स्वदेशी (आसामी भाषिक) म्हटले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सर्वेक्षण सुरू होऊ शकते. सुमारे 100 कोटी रुपयांचे बजेटही आहे. आसामची एकूण लोकसंख्या 3.66 कोटी आहे. त्यापैकी सुमारे 1.17 कोटी मुस्लिम आहेत. त्यापैकी केवळ 42 लाखच स्थानिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.Socio-Economic Survey to be held in Assam from this month; Examination of 70 lakh Mian Muslims in the state; The government considers them foreigners

    गुवाहाटी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि विविध सरकारी समित्यांचे सदस्य म्हणतात की, स्थानिक लोकांची ओळख करण्यासाठी सर्व मुस्लिमांचे सर्वेक्षण केले जाईल. सर्व कागदपत्रे तपासली जातील. सर्वेक्षणाचे स्वरूप तयार आहे. त्यात पिढ्यांच्या नोंदींचा स्तंभ असेल. आदिवासींची ओळख करून त्यांच्या विकासासाठी स्वायत्त परिषद स्थापन करण्यात येईल. उरलेल्या मुस्लिमांचे काय होणार नाही.



    कसे होईल सर्वेक्षण

    हे सर्वेक्षण आसामच्या अल्पसंख्याक आणि परिवर्तनीय क्षेत्र संचालनालयाकडून केले जाणार आहे. त्याचे संचालक सय्यद ताहिदुर रहमान म्हणतात की, सर्वेक्षणाबाबत एक एसओपी सरकारला सादर करण्यात आली आहे. मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल. संचालनालयाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी काही पद्धती तयार केल्या आहेत. पेहराव, बोलीभाषा, कागदपत्रे, सर्वकाही यामध्ये तपासले जाऊ शकते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण हाणे अवघड आहे.

    फक्त 5 समुदायच आसामी, बाकीचे बंगाली भाषिक

    आसाम सरकारने गोरिया, मोरिया, जोलाह, देसी व सय्यद या 5 समुदायांनाच स्वदेशी मानले आहे. त्यांची वस्ती वरचा आसाम म्हणजेच चहाच्या बागांच्या आसपास आहे. त्यांचा बांगलादेशशी संबंधांचा इतिहास नाही. मोरिया हा मागासवर्गीय आहे. देसी कोच राजवंशी हे आदिवासी होते, ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला. म्हणून त्यांना आसामी मानले जाते.

    खालच्या आसाम किंवा ब्रह्मपुत्रकिनारी राहणारे 70 लाख मुस्लिम बंगाली भाषिक आहेत. नदी हेच त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन. येथील कोणत्याही मुस्लिमबहुल गावात तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला बहुतेक लोकांना लांब दाढी, जाळीदार टोप्या, लुंगी आणि कुर्ता दिसेल. बंगाली उच्चार त्यांच्या आसामी बोलीमध्ये आढळतील. तर अपर आसाममध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिमांचा पेहराव, भाषा व जीवनशैली हिंदूंशी जुळते.

    Socio-Economic Survey to be held in Assam from this month; Examination of 70 lakh Mian Muslims in the state; The government considers them foreigners

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले