• Download App
    '..तर बिहारी लोकांना हनिमून साठीही स्थलांतरित व्हावं लागेल' : कन्हैया कुमार | '..So Biharis will have to migrate for honeymoon too': Kanhaiya Kumar

    ‘..तर बिहारी लोकांना हनिमून साठीही स्थलांतरित व्हावं लागेल’ : कन्हैया कुमार

    विशेष प्रतिनिधी

    तारापूर : बिहारमधील पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांनी नितीश सरकारच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली आहे. कन्हैया कुमार म्हणतात बिहारमध्ये लोकांना रोजगार शिक्षण उपचार यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. आता अशी परिस्थिती येईल की लोकांना हनिमूनसाठी सुद्धा स्थलांतरित व्हावे लागेल. राज्यात स्थलांतर ही एक मोठी समस्या आहे. आणि नितीश सरकारच्या नेतृत्वाखाली विकास शुन्य आहे.

    ‘..So Biharis will have to migrate for honeymoon too’: Kanhaiya Kumar

    त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेससोबतची युती तोडल्याबद्दल देखील जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात,आरजेडीने हे लक्षात ठेवले पाहिजे की कॉंग्रेस हा एक मोठा पक्ष आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय देशात कोणत्याही सरकार स्थापन होऊ शकत नाही. राज्यातील स्थलांतराचा दर रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याबद्दल नितीशकुमार सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.


    काश्मीरमध्ये बिहारींच्या हत्येवर नितीश कुमार म्हणाले – “कुछ तो गड़बड़ है , हेतुपुरस्सर लक्ष्य केलं जातय”


    कन्हैया 25 ऑक्टोबरपर्यंत तारापूर येथे आहेत तर 26 आणि 28 ऑक्टोबरपर्यंत कुशेईश्वर आस्थापनांमध्ये प्रचार करणार आहेत. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस चांगली कामगिरी करेल आणि दोन्ही जागा जिंकेल असा त्यांनी विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

    ‘..So Biharis will have to migrate for honeymoon too’: Kanhaiya Kumar

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते