• Download App
    सभापतींच्या निर्णयाविरोधात हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात |Six rebel Congress MLAs from Himachal Pradesh in the Supreme Court against the Speakers decision

    सभापतींच्या निर्णयाविरोधात हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात

    या सहा काँग्रेस आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केले होते

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशमधील सहा बंडखोर काँग्रेस आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आमदारांनी अपात्र ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पावेळी उपस्थित नसल्याच्या कारणावरून सभापतींनी या आमदारांना अपात्र ठरवले. आमदारांनी सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले असून तो रद्द करण्याची मागणी होत आहे.

    Six rebel Congress MLAs from Himachal Pradesh in the Supreme Court against the Speakers decision


    या सहा काँग्रेस आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केले होते. त्यामुळे भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले. यादरम्यान काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हे आमदार भाजपाच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना दिसले. या आमदारांच्या क्रॉस व्होटिंगनंतर राज्यातील सुखविंदर सिंह सखू सरकार अडचणीत आले. बंडखोर आमदारांवर कडक कारवाई करण्याची काँग्रेसमध्ये चर्चा होती.

    हिमाचल प्रदेश विधानसभेत २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मंजूर करताना गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या काही आमदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी सांगितले की, मंगळवारी म्हणजेच ५ मार्च रोजी काही सदस्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे.

    Six rebel Congress MLAs from Himachal Pradesh in the Supreme Court against the Speakers decision

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!