विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला होता. मात्र, अफगणिस्थानातून शिख निर्वासित येऊ लागल्याने आता अकाली दलाच्या भूमिकेत बदल झाला असून आता त्यांनाी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठीची मुदत वाढविण्याचीही मागणी केली आहे.Sikh refugees in Afghanistan change Shiromani Akali Dal’s stand, now support for Citizenship Reform Act
अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर एस सिरसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना कायद्यात सुधारणा करण्याची आणि नागरिकत्व मिळविण्यासाठीची तारखी २०१४ पासून २०२१ पर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले अहे की, अफगणिस्थानातील संकट पाहता कट ऑफ डेट वाढविण्याची गरज आहे.
मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सीएएमध्ये सुधारणा करावी आणि कट ऑफची तारीख 2014 ते 2021 पर्यंत वाढवावी जेणेकरून अफगाणिस्तानातून येणाºया शिख समाजातील नागरिकांना फायदा होईल. त्यांना भारतामध्ये सुरक्षित जीवन जगणे शक्य होईल. त्यांची मुले शिक्षण घेऊ शकतील.
सीएएच्या विरोधात आवाज उठवणाºया शिरोमणी अकाली दलाने आपली भूमिका बदलल्याने भारतीय जनता पक्षाने टोला लावला आहे. भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रभारी अमित मालवीय यांनी सीएएला विरोध करण्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतल्याबद्दल मनजिंदर एस सिरसा यांच्यावर निशाणा साधला.
त्यांनी म्हटले आहे की, सीएएला विरोध करण्यापासून ते सीएएची कट ऑफ डेट वाढवण्यापर्यंत विचारण्यापर्यंत, सीएएविरोधी ब्रिगेड आता मानवतावादी सीएए कायद्याचे महत्त्व मान्य करते. काँग्रेस आणि अकालींनी पंजाब विधानसभेत सीएएविरोधी ठरावाला पाठिंबा दिला होता.
सिरसा यांनी काबुल विमानतळावर अडकलेल्या भारतीयांचा व्हिडिओ शेअर करताना सरकारला युद्धग्रस्त देशातून लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याची विनंती केली होती. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सीएएचे समर्थन करताना म्हटले होते की तालिबानचे संकट हे देशाला या कायद्याची गरज का आहे याचे उदाहरण आहे. या अशांत परिसरातील अलीकडील घडामोडी आणि शीख आणि हिंदूंना ज्या पध्दतीने त्रास दिला जात आहे यावरून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणे आवश्यक का होते हे स्पष्ट झाले आहे.
नागरिकत्व (सुधारणा) कायद्यात नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन नागरिकांना नागरिकत्वासाठी पात्र ठरणार आहेत.
Sikh refugees in Afghanistan change Shiromani Akali Dal’s stand, now support for Citizenship Reform Act
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानचा कहर : अफगाणिस्तानात दुप्पट झाल्या बुरख्याच्या किमती , जीन्स घातल्याबद्दल झाली मारहाण
- पोलीसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणतात आणि न्यायालयात थपडा खातात, अनिल परब, निलम गोऱ्हे यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा चंद्रकांत पाटील यांचा इशारा
- पंजाबमध्ये चार मंत्री, आमदारांचे अमरिंदरसिंगांविरोधात बंड, कॅप्टनवर विश्वास नाही
- नारायण राणे यांच्या अटकेच्या प्लॅनमागचे मास्टरमाइंड अनिल परब, पोलीसांच्या सतत संपर्कात, व्हिडीओ व्हायरल
- G-7 मध्ये घेतला निर्णय ,काबूल विमानतळ 31 ऑगस्टपर्यंत रिकामे केले जाणार नाही, तालिबानला द्यावा लागणार सुरक्षित मार्ग