वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूळ संकल्पनेशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून भारतीय राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकण्यात आले आहेत. हे शब्द काढून टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Shocking Preamble of constitution changed in Telangana, words socialist and secular removed from class 10 books
नव्या आवृत्तीच्या पुस्तकातून सोशलिस्ट म्हणजेच समाजवाद आणि सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष हे शब्द काढून टाकल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर तेलंगणा राज्य युनायटेड टीचर्स फेडरेशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याच वेळी, SCERT म्हणते की त्यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकातून असा कोणताही शब्द काढण्याबद्दल सांगितले नाही. आता प्रश्न पडतो की त्यांनी हे आदेश दिले नाहीत, मग हे शब्द कसे काढले? या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
तपास अहवालात काय समोर आले?
या संपूर्ण प्रकरणात दहावीची पुस्तके छापण्यापूर्वी प्रूफ रीडिंगच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे एससीईआरटीने स्पष्ट केले. त्याचवेळी राज्य शिक्षण मंडळाने सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (डीईओ) आदेश दिले आहेत की, ज्या पुस्तकांमध्ये हे शब्द छापण्यात आले आहेत, त्या पुस्तकांवर राज्यघटनेची मूळ प्रस्तावना छापून त्या पानावर चिकटवावी, जेणेकरून कोणताही विद्यार्थी संविधानाची चुकीची प्रस्तावना वाचणार नाही.
तेलंगणामध्ये भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना बदलण्यात आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. तर शिक्षण मंडळ मात्र अशा कोणत्याही घटनेचे सातत्याने खंडन केले आहे. तेलंगणा तेलंगणा स्टेट युनायटेड टीचर्स फेडरेशनने (टीएसयूटीएफ) ही मोठी चूक असल्याचे म्हटले असून ते छापणाऱ्या चुकीच्या प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Shocking Preamble of constitution changed in Telangana, words socialist and secular removed from class 10 books
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्याच्या बैठकीत राहुल गांधींच्या लग्नाचा विषय, लालू यादव म्हणाले- महात्माजी आता लग्न करा, आम्ही वरातीत चालू
- मुस्लिम महिला घटस्फोटानंतरही मागू शकते पोटगी; मुंबई हायकोर्टाने म्हटले- महिलेला स्टँडर्ड राखण्याचा अधिकार, जो पतीसोबत होता
- जयंत पाटलांच्या राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापे; 1000 कोटींच्या जुन्या घोटाळ्याचा तपास, बनावट खात्यांमधून मनी लाँड्रिंगचा संशय
- अभिमानास्पद : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध इमारतींवर झळकला भारताचा ‘तिरंगा’