• Download App
    कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या पटियालात खलिस्तानी समर्थकांना शिवसैनिक भिडलेShiv Sainiks attacked Khalistani supporters in Captain Amarinder Singh's Patiala

    कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या पटियालात खलिस्तानी समर्थकांना शिवसैनिक भिडले!!; दगडफेक, तलवारी नाचवल्या, पोलिसांचा गोळीबार

    वृत्तसंस्था

    पतियाला : पंजाबच्या पटियाला शहरात शुक्रवारी शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये संघर्ष पेटला. शिवसेनेने खलिस्तान्यांच्या विरोधात मोर्चा काढला असता पटियाला शहरातील काली माता मंदिरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंदू आणि शीख संघटनांमध्ये दगडफेकीच्या घटनाही घडल्या. घटनास्थळी नियंत्रण मिळवण्यासाठी एसएसपी पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. या दरम्यान हिंदू नेता आणि त्रिपदीचे एसएचओ कर्मवीर सिंग जखमी झाले.

    शिवसेना कधीही खलिस्तान होऊ देणार नाही

    यासंदर्भात शिवसेनेचे हरिश सिंगला म्हणाले की, शिवसेना कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही आणि कोणाला खलिस्तानीचं नावही घेऊ देणार नाही. सिख फॉर जस्टिसचे निमंत्रक गुरपतवंत पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही 29 एप्रिललाच खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते.

    शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक

    या मोर्चाबद्दल माहिती मिळताच खलिस्तानी समर्थक मोठ्या प्रमाणावर तिथे गोळा झाले होते. या मोर्चात शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. पटियाला शहरातील काली माता मंदिर परिसरात शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक झाली. या सगळ्या गोंधळामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. खलिस्तानी समर्थकांनी तलवारीने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत 15 राऊंड फायर करावे लागले.

    Shiv Sainiks attacked Khalistani supporters in Captain Amarinder Singh’s Patiala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे