याआधी शनिवारी आंदोलकांनी बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सरन्यायाधीशांना राजीनामा देण्यास भाग पाडले.
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आता लष्करालाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आंदोलकांनी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालजंग भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी शनिवारी आंदोलकांनी बांगलादेशी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सरन्यायाधीशांना राजीनामा देण्यास भाग पाडले.
शेख हसीना यांच्या परतीच्या मागणीसाठी अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना आंदोलकांनी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही आंदोलकांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त अनेक पत्रकार आणि स्थानिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना गोळ्याही लागल्या आहेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सैनिकांनी रस्ता अडवून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा निदर्शकांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या निदर्शनात अवामी लीगचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक सामील होते, जे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या देशात परतण्याची मागणी करत होते.
Bangladesh is now demanding For of Sheikh Hasina
महत्वाच्या बातम्या
- Waqf Bill : 99 % जमीन गुंडांच्या ताब्यात; मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा घणाघात; संघाला मशिदी ताब्यात घ्यायच्यात; ओवैसींचा कांगावा!!
- India hockey Team : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, स्पेनला हरवून हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले
- Eknath Shinde : बांगलादेश हिंसाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा!
- Vinesh Phogat : विनेश फोगटला अजूनही जिंकू शकते रौप्यपदक?, CAS लवकरच निर्णय देणार!