भारत सरकारने जगभरातील ३२ देशांमध्ये ७ शिष्टमंडळे पाठवली आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shashi Tharoors काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाच देशांच्या दौऱ्यावर आहे. हे पथक रविवारी अमेरिकेहून गयानाला पोहोचले. जिथे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा दहशतवादाबाबत पाकिस्तानला कडक संदेश दिला.Shashi Tharoors
थरूर म्हणाले की, भारत आपल्या नागरिकांना मारल्यानंतर कोणालाही “लपून पळून जाण्याची” परवानगी देणार नाही. ते म्हणाले की, भारत केवळ “क्रूर मारेकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापुरता मर्यादित राहणार नाही” तर दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या, प्रशिक्षण देणाऱ्या आणि शस्त्रास्त्र देणाऱ्यांनाही आव्हान देईल.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाची खात्री करण्यासाठी आणि दहशतवादाबाबत पाकिस्तानला जगासमोर आणण्यासाठी, भारत सरकारने जगभरातील ३२ देशांमध्ये ७ शिष्टमंडळे पाठवली आहेत. यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर करत आहेत. थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रविवारी अमेरिकेहून गयानाची राजधानी जॉर्जटाऊन येथे पोहोचले.
काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, “आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आपल्याला दहशतवाद कुठेही असो, त्याच्या विरोधात उभे राहावे लागेल. आपल्याला केवळ दुष्ट मारेकऱ्यांनाच शिक्षा कराची नाही, तर त्यांना निधी देणाऱ्या, त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या, त्यांना सुसज्ज करणाऱ्या आणि त्यांचे दुष्ट काम करण्यास सांगणाऱ्यांनाही गंभीरपणे आव्हान द्यायचे आहे.”
Shashi Tharoors stern warning to Pakistan said You cannot get away with killing civilians
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं