• Download App
    सत्यपाल मलिक यांचे पुन्हा खळबळजनक वक्तव्य, 2024 ला जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो|Satyapal Malik's sensational statement again, BJP can go to any extent to win 2024

    सत्यपाल मलिक यांचे पुन्हा खळबळजनक वक्तव्य, 2024 ला जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त बोलून पंतप्रधान नरेद्र मोदींवर निशाणा साधणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा एक नवा खळबळजनक दावा केला आहे. मलिक यांच्या दाव्यानुसार 2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी राममंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो. मलिक यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.Satyapal Malik’s sensational statement again, BJP can go to any extent to win 2024



    हे काहीही करू शकतात

    सत्यपाल मलिक म्हणाले की, 2024 मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राममंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतात. जे लोक पुलवामा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. या लोकांना कशाचीही पर्वा नाही. ते चुकीच्या मार्गाने चालले आहेत, असा दावा मलिक यांनी केली.

    सत्यपाल मलिक यांनी उलगडले पुलवामा हल्ल्यामागचे मोठे रहस्य

    14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील सरकार जबाबदार असल्याचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ती नाकारली.

    Satyapal Malik’s sensational statement again, BJP can go to any extent to win 2024

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य