• Download App
    संजय राऊतांनी पत्राचा घोटाळ्यातील तुरुंगवासाची केली तुलना सावरकर + टिळक + वाजपेयींच्या तुरुंगवासाशीSanjay Raut compares Patra's jail term to that of Savarkar + Tilak + Vajpayee

    संजय राऊतांनी पत्राचा घोटाळ्यातील तुरुंगवासाची केली तुलना सावरकर + टिळक + वाजपेयींच्या तुरुंगवासाशी

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वतःला भोगाव्या लागलेल्या 102 दिवसांच्या कारावासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकमान्य टिळक + स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आणीबाणीत संघर्ष केलेल्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तुरुंगवासाशी केली आहे. Sanjay Raut compares Patra’s jail term to that of Savarkar + Tilak + Vajpayee

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला जाण्यापूर्वी पत्रकारांना दिलेल्या बाईट मध्ये त्यांनी तुरुंगवास खूप अवघड असतो असे सांगितले आणि आपल्या तुरुंगवासाची तुलना त्यांनी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तुरुंगवासाशी केली. संजय राऊत म्हणाले तुरुंगवास किती अवघड असतो, हे केवळ आपण वाचून समजू शकतो.



    परंतु मला तुरुंगवास झाला. तुरुंगात राहावे लागले. मी सावरकरांच्या एकलकोंडीसारखा एकांतवासात राहिलो. सावरकर अंदमानात 10 वर्षे कसे राहिले असतील, लोकमान्य टिळक मंडलेमध्ये 6 वर्षे कसे राहिले असतील, अटल बिहारी वाजपेयी हे देखील आणीबाणीच्या काळात 2.5 वर्षे तुरुंगात होते त्यांनी कसे दिवस काढले असतील, याची जाणीव मला झाली. राजकारणातल्या व्यक्तींना तुरुंगवासात जावेच लागते.

    एक प्रकारे संजय राऊत यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या नेत्यांच्या तुरुंगवासाची तुलना स्वतःला मनी लॉन्ड्रींग प्रकरणात भोगावे लागलेल्या 102 दिवसांच्या तुरुंगवासाशी केली. या मुद्द्यावरून सोशल मीडियात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

    Sanjay Raut compares Patra’s jail term to that of Savarkar + Tilak + Vajpayee

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही पाकिस्तानला हरवले; सैन्य ही अशी जागा, जिथे घराणेशाही नाही

    Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही