• Download App
    साहित्य अकादमी पुरस्कार २०२०, महाराष्ट्राला दोन अनुवाद पुरस्कार व भालचंद्र नेमाडे यांना मानाची फेलोशिप जाहीर | Sahitya Academy Award 2020, Bhalchandra Nemade won honorary fellowship award and Maharashtra won 2 awards

    साहित्य अकादमी पुरस्कार २०२०, महाराष्ट्राला दोन अनुवाद पुरस्कार व भालचंद्र नेमाडे यांना मानाची फेलोशिप जाहीर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: शनिवारी १८ सप्टेंबर रोजी साहित्य अकादमीने मानाचा फेलोशिप पुरस्कार व २०२० अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले प्रसिद्ध मराठी लेखक भालचंद्र नेमाडेना सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर झालेली आहे. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी अनुवादासाठी पुरस्कार देण्यात आला.

    Sahitya Academy Award 2020, Bhalchandra Nemade won honorary fellowship award and Maharashtra won 2 awards

    भालचंद्र नेमाडे यांची आत्तापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी लंडनमधील ‘स्कूल ऑफ ओरिअंटल अॅन्ड आफ्रिकन स्टडीज’ सारख्या विद्यापीठांमध्ये मराठी, इंग्रजी व तौलानिक साहित्याचा अभ्यास केलेला आहे. ताम्रपत्र आणि शाल या स्वरुपात मानाची फेलोशिप हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.


    कोल्हापुरातील साहित्यिका सोनाली नवांगुळ यांना २०२० साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार जाहीर. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ह्या अनुवादित कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर.


    मध्यरात्रीनंतरचे तास’ या तामीळ भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या कादंबरीसाठी सुप्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रकाशमार्गा: या संस्कृतमधील अनुवादित पुस्तकाकरीता प्रसिद्ध लेखिका मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवाद पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानचिन्ह, ५० हजार रूपये व ताम्रपत्र अशा स्वरुपात वितरण करण्यात येईल.

    Sahitya Academy Award 2020, Bhalchandra Nemade won honorary fellowship award and Maharashtra won 2 awards

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली