Sunday, 11 May 2025
  • Download App
    S Jaishankar ''बांगलादेशने दहशतवादाचा मुद्दा हलक्यात घेऊ नये''

    S Jaishankar ”बांगलादेशने दहशतवादाचा मुद्दा हलक्यात घेऊ नये”

    S Jaishankar

    एस जयशंकर यांनी बांगलादेशला दिला इशारा S Jaishankar

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून देशभरात भारतविरोधी वातावरण दिसून येत आहे. यास अंतरिम सरकारकडून पाठिंबा मिळत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सार्क संघटनेच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यात व्यस्त आहे.

    या प्रकरणात, भारताने बांगलादेश सरकारला इशारा दिला आहे की त्यांनी दहशतवादासारख्या बाबींना हलक्यात घेऊ नये. हे स्वतः परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेश सरकारमधील परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसेन यांना सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यास दुजोरा दिला आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या काही सल्लागारांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते सतत भारताच्या हिताच्या विरोधात विधाने करत आहेत. अशाप्रकारे द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना नुकसान होईल असे म्हटले गेले. जयस्वाल यांच्या मते, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मस्कत (दोहा) येथे बांगलादेशचे तौहीद हुसेन यांची भेट घेतली. त्यावेळी बांगलादेशचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले की बांगलादेशने दहशतवादाचा मुद्दा हलक्यात घेऊ नये.

    २०१६ पासून सार्क देशांची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर भारतावरील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले. त्यानंतर, भारताव्यतिरिक्त, अफगाणिस्तान, बांगलादेशसह इतर सार्क सदस्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये इस्लामाबाद येथे होणाऱ्या सार्क शिखर परिषदेवर बहिष्कार टाकला होता. यामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला.

    ऑगस्ट २०२४ मध्ये मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सत्ता हाती घेतली. काही दिवसांनी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी, सार्क संघटना पुन्हा सक्रीय करण्यासाठी देखील पाठिंबा देण्यात आला. यानंतर दोन्ही नेत्यांची भेटही झाली. तेव्हाही दोघांमध्ये सार्कबद्दल चर्चा झाली.

    S Jaishankar warns Bangladesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार