कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी निवृत्त होताच जाहीर केला निर्णय RSSs decision on working was announced after the retirement of a judge of Kolkata High Court
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून सोमवारी निवृत्त झालेले न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांचे निरोपाचे भाषण चर्चेत आहे. निरोप समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य होतो, आहे आणि आता संघासाठी काम करण्यास तयार आहे.
न्यायमूर्ती दास ओरिसा उच्च न्यायालयातून बदली करून कोलकात्ता उच्च न्यायालयात आले आणि तेथून सोमवारी निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभाला उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि बार सदस्यही उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना न्यायमूर्ती दास म्हणाले, ‘काही लोकांना हे आवडत नसले तरी, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होतो आणि आहे हे मला येथे मान्य करावे लागेल. जर त्यांना कोणत्याही कामासाठी बोलावले गेले तर ते करू शकतात आणि पुन्हा परत जाण्यासही तयार आहे’. असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती दास म्हणाले, ‘मी संघाचा खूप ऋणी आहे… मी लहानपणापासून माझ्या तरुणपणापर्यंत तिथे राहिलो आहे.’ ते म्हणाले, ‘मी धाडसी, प्रामाणिक आणि इतरांबद्दल समान दृष्टीकोन आणि देशभक्ती, कामाची भावना बाळगणे शिकलो आहे. मी संघाकडूनच वचनबद्धतेबद्दल शिकलो आहे.
न्यायमूर्ती दास म्हणाले की, त्यांच्या कामामुळे त्यांनी सुमारे ३७ वर्षे संघापासून अंतर ठेवले होते. ते म्हणाले, ‘संस्थेच्या सदस्यत्वाचा उपयोग मी कधीच माझ्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी केला नाही. कारण ते संघाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.’
न्यायमूर्ती दास म्हणाले की, त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली, मग तो श्रीमंत व्यक्ती असो, कम्युनिस्ट असो किंवा भाजप, काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसचा असो. ते म्हणाले, ‘माझ्यापुढे सर्वजण समान आहेत, माझा कोणाशीही पूर्वग्रह किंवा कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञान किंवा व्यवस्थेबाबत पूर्वग्रह नाही.’
RSSs decision on working was announced after the retirement of a judge of Kolkata High Court
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील 37 मशिदींमधून व्होट जिहादचे फतवे; शिवसेनेची निवडणूक आयोग + पोलिसांमध्ये तक्रार!!
- कन्या प्रेमापोटीच पवारांनी राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केले नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा आरोप!!
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार!
- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मोठं विधान