वृत्तसंस्था
तिरुवनंतरपुरम : सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केरळच्या लोकांनी 34 कोटी रुपये उभे केले आहेत. अब्दुल रहीम असे या व्यक्तीचे नाव असून तो कोझिकोडचा रहिवासी आहे. 2006 मध्ये त्याच्यावर सौदी मुलाच्या मृत्यूचा आरोप होता. गेल्या 18 वर्षांपासून तो सौदीच्या तुरुंगात बंद आहे.Rs 34 crore blood money to save an Indian sentenced to death in Saudi; Money raised through crowd funding
त्याच्या सुटकेसाठी स्थापन करण्यात आलेली कृती समिती पाच दिवसांपूर्वी फारच कमी रक्कम जमा करू शकली, परंतु मोहीम जसजशी पुढे सरकत गेली तसतसे जगभरात राहणाऱ्या केरळच्या लोकांनी 34 कोटी रुपये उभारण्यास मदत केली.
काय होतं प्रकरण…
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, रहीमला सौदी अरेबियाच्या एका कुटुंबाने त्यांच्या 15 वर्षांच्या विशेष दिव्यांग मुलाचा ड्रायव्हर आणि केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. 2006 मध्ये एका वादाच्या वेळी रहिमच्या चुकीमुळे मुलाच्या घशातील पाईप निखळला. ऑक्सिजनअभावी मुलगा बेशुद्ध झाल्याचे रहिमच्या लक्षात आले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूसाठी रहीमला जबाबदार धरण्यात आले आणि 2012 मध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात आले. मुलाच्या कुटुंबीयांनी रहीमला माफ करण्यास नकार दिला. त्याला पहिल्यांदा 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि नंतर ती 2022 पर्यंत कायम ठेवण्यात आली होती. त्याच्याकडे दोनच पर्याय होते. एकतर मृत्यू निवडावा किंवा 34 कोटी ब्लड मनीची व्यवस्था करून मुलाच्या कुटुंबीयांना द्यावी.
उद्योगपतींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी पैसा उभा करण्यात मदत केली
कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने रहीमच्या सुटकेसाठी केलेले सर्व अपील फेटाळले होते, परंतु नंतर कुटुंबाने ब्लड मनीच्या बदल्यात त्याची सुटका करण्याचे मान्य केले. यानंतर रियाधमधील 75 संस्था, केरळमधील व्यापारी, अनेक राजकीय संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन पैसे उभारणीसाठी मदत केली.
Rs 34 crore blood money to save an Indian sentenced to death in Saudi; Money raised through crowd funding
महत्वाच्या बातम्या
- ताहाने रचला होता कट, तर शाजिबने पेरला IED, अखेर असे जेरबंद झाले बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी
- पंतप्रधान मोदी म्हणाले- ईडी प्रकरणांपैकी फक्त 3% प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित
- केंद्रीय माहिती आयोगाची निवडणूक आयोगाला नोटीस; EVM-VVPAT शी संबंधित RTIला प्रतिसाद दिला नाही
- मोदी म्हणाले, संविधान आमच्यासाठी कुराण, बायबल आणि गीता!!; या विधानाचा अर्थ समजतोय का??