• Download App
    Republic Day : 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील लाल चौकातील 'क्लॉक टॉवर' वर फडकला तिरंगा|Republic Day: For the first time in 75 years, the tricolor was hoisted on the 'Clock Tower' at Lal Chowk in Srinagar

    Republic Day : 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील लाल चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर फडकला तिरंगा

    दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर कधीच तिरंगा फडकावला नाही.Republic Day: For the first time in 75 years, the tricolor was hoisted on the ‘Clock Tower’ at Lal Chowk in Srinagar


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे.यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात आहे. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर येथील लाल चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर तिरंगा फडकावला व राष्ट्रगीत गायलं आहे.

    दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील ‘क्लॉक टॉवर’ वर कधीच तिरंगा फडकावला नाही. त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक मानावा लागणार आहे.तसेच यावेळी भारत माता की जय ! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक तरूणांसह महिला आणि लहान मुले उपस्थित होते.



    कलम 370 हटवल्यानंतर आणि दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे श्रीनगर येथील स्थानिक युवक समोर येत आहे.तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही ठिकाणी शार्प शूटर देखील तैनात करण्यात आले होते.तसेच रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते.

    Republic Day: For the first time in 75 years, the tricolor was hoisted on the ‘Clock Tower’ at Lal Chowk in Srinagar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये