15,000 घरांचे नुकसान; 25 उड्डाणे रद्द Remal storm hit Six died in Bengal and 10 in Bangladesh
विशेष प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : रेमाल चक्रीवादळ एक दिवस आधी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. 21 तासांनंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा पुन्हा सुरू झाली परंतु खराब हवामानामुळे आठ उड्डाणे वळवण्यात आली आणि 14 उड्डाणे रद्द करावी लागली. त्याचवेळी वादळामुळे सहा जणांचा मृत्यू झाला.
एएआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, खराब हवामानामुळे कोलकाताला जाणारी आठ उड्डाणे गुवाहाटी, गया, वाराणसी आणि भुवनेश्वरसारख्या अन्य विमानतळांवर वळवावी लागली. कोलकाता विमानतळाचे संचालक सी पट्टाभी यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.
गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुवाहाटी ते कोलकाता 14 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रद्द करण्यात आलेल्या फ्लाइट्समध्ये इंडिगोच्या चार, अलायन्स एअरच्या चार आणि एअर इंडियाच्या एका फ्लाइटचा समावेश आहे. त्याचवेळी खराब हवामानामुळे आगरतळा विमानतळावरून 11 उड्डाणे रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बंगालच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार चक्रीवादळामुळे कोलकात्यात एकाचा, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील दोन महिला आणि पूर्व मेदिनीपूरमधील मेमारीमध्ये एक पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चक्रीवादळामुळे 15 हजार घरांचे नुकसान झाले आहे. दोन लाखांहून अधिक लोकांना बचाव छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. 77 हजारांहून अधिक लोक अजूनही मदत शिबिरात आहेत.
राज्यभरात शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. पोलीस आणि एनडीआरएफ त्यांना हटवत आहेत. विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज यंत्रणाही बिघडली आहे. याशिवाय बांगलादेशात सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील 15 दशलक्ष लोक वीजविना आहेत.
Remal storm hit Six died in Bengal and 10 in Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- 6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू
- 8 राज्यांतील 58 जागांवर 58.82% मतदान; बंगालमध्ये BJP उमेदवारावर हल्ला, पक्षाचा TMC वर आरोप
- चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू
- राजकोटच्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, तब्बल 24 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये 12 मुले; DNA टेस्टद्वारे पटवणार ओळख