• Download App
    जय श्रीराम म्हणणारे सगळेच संत नाहीत, रशीद अल्वींच्या विधानामुळे भाजप संतप्त |Rashid Alwis controversial remarks

    जय श्रीराम म्हणणारे सगळेच संत नाहीत, रशीद अल्वींच्या विधानामुळे भाजप संतप्त

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – रामायणातील राक्षसांचा संदर्भ देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी जय श्रीरामच्या नावाने घोषणा देणारी सगळीच मंडळी ही काही साधूसंत नसल्याचे सांगत लोकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अल्वी यांच्या या विधानावर भाजप नेते अमित मालवीय यांनी कडाडून टीका केली आहे.Rashid Alwis controversial remarks

    येथे आयोजित कल्की संमेलनामध्ये अल्वी म्हणाले की,” काही मंडळी ही जय श्रीरामच्या नावाने घोषणाबाजी करत लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत पण हे सगळेच घोषणा देणारे लोक काही साधूसंत अथवा मुनी नाहीत. रामराज्यामध्ये द्वेषाला स्थान स्थान नसते.



    अल्वी यांच्या या विधानावर भाजपने कडाडून टीका केली आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अल्वी यांनी रामाच्या नावाने घोषणा देणाऱ्यांनाच राक्षस ठरविले असून रामांच्या भक्तांबाबत कॉंग्रेसच्या विचारांमध्ये किती विष भरलेले आहे हेच यातून स्पष्ट होते.”

    Rashid Alwis controversial remarks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार

    Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले- E20 पेट्रोलमुळे कोणत्याही वाहनात समस्या नाही; समस्या असेल तर किमान एक तरी उदाहरण द्या