राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले निमंत्रित
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना अयोध्येची निमंत्रण पत्रिका मिळाली आहे. हे जोडपे 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पदाधिकाऱ्यांनी निमंत्रित केले आहे. Ranbir Kapoor Alia Bhatt invited to Ram Mandir dedication ceremony
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. त्याला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा म्हटले जात आहे. या ऐतिहासिक दिवशी राजकारण, उद्योग, क्रीडा क्षेत्रापासून बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. आता कंगना राणौतनंतर रणबीर आणि आलियाच्या नावाचाही यात समावेश झाला आहे.
सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारताना दिसत आहेत. रणबीर आणि आलिया यांना आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आणि आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुडपे यांच्याकडून निमंत्रण मिळाले आहेत.
राम मंदिराच्या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स सहभागी होणार आहेत. कंगना राणौतला उद्घाटनाच्या 16 दिवस आधीच निमंत्रित करण्यात आले आहे. ती राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार आहे. कंगनाने राम मंदिराच्या निमंत्रणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील या सोहळ्याचा भाग असणार आहेत.
याशिवाय आणखी काही स्टार्सचीही नावे असू शकतात. आम्हाला आशा आहे की अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यासह इतर काही दिग्गज कलाकारांनाही निमंत्रित केले जाऊ शकते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दक्षिणेतील कलाकारही सहभागी झाल्याची बातमी आहे.
Ranbir Kapoor Alia Bhatt invited to Ram Mandir dedication ceremony
महत्वाच्या बातम्या
- शासन आपल्या दारी कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींचे लाभ!!
- पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!
- सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!
- महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत आणखी भूकंप; राष्ट्रवादीत खळबळ, सगळ्या विरोधी पक्षाची स्पेस काँग्रेससाठी मोकळी??