• Download App
    'आता राजस्थान आक्रोश सहन करणार नाही', उद्या भाजपा राजस्थान सचिवालयाला घेराव घालणार Rajasthan will not tolerate outrage now BJP will besiege the Rajasthan Secretariat tomorrow

    ‘आता राजस्थान आक्रोश सहन करणार नाही’, उद्या भाजपा राजस्थान सचिवालयाला घेराव घालणार

    भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अरुण सिंह यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारबाबत भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ‘राजस्थानमध्ये बहिणी आणि मुली सुरक्षित नाहीत. महिला आणि दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपा उद्या म्हणजेच १ ऑगस्टला राजस्थान सचिवालयाचा घेराव करणार आहे. Rajasthan will not tolerate outrage now BJP will besiege the Rajasthan Secretariat tomorrow

    भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अरुण सिंह म्हणाले, ’28 जुलै रोजी 24 तासांत राजस्थानमध्ये 21 घटना घडल्या. बुंदीच्या लाखेरी गावात एका महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली. पाली येथे तरुणाची हत्या, करौली येथे सात दिवसांचा मृतदेह सापडला आणि जयपूरच्या सदर भागात चाकूने एका व्यक्तीचा गळा चिरण्यात आला. राजस्थानमध्ये दररोज 17-18 बलात्काराच्या घटना घडत आहेत.

    अरुण सिंह म्हणाले, ‘एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महिलांच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत आहेत. मात्र राहुल गांधी, प्रियांका गांधी किंवा अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याने तेथे जाऊन पीडितांची भेट घेतली नाही.

    भाजपाने म्हटले की, ‘सर्वात अशोभनीय गोष्ट म्हणजे राजस्थान विधानसभेत महिलांवरील बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांवर चर्चा होत असताना राजस्थानच्या जबाबदार मंत्री शांती धारीवाल यांनी राजस्थान हे पुरुषांचे राज्य असल्याचे सभागृहात सांगितले. राजस्थानच्या नंबर 2 मंत्र्याने असे बोलून महिलांचा अपमान केला आहे.

    Rajasthan will not tolerate outrage now BJP will besiege the Rajasthan Secretariat tomorrow

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Vadodara : वडोदरामध्ये पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज