• Download App
    Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, 'या' सात खासदारांना मिळाले तिकीट! Rajasthan Election BJP announced the first list of candidates Seven MPs got tickets

    Rajasthan Election : भाजपाने उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, ‘या’ सात खासदारांना मिळाले तिकीट!

    जाणून घ्या,  मतदानासह निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम काय असणार आहे?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या यादीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पक्षाने पहिल्या यादीत एकूण 41 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या 41 उमेदवारांपैकी 7 खासदारांनाही तिकीट देण्यात आले आहे. Rajasthan Election BJP announced the first list of candidates Seven MPs got tickets

    भाजपाने झोटवाडा येथून खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांना तिकीट दिले आहे. त्याचवेळी पक्षाने मांडवा मतदारसंघातून नरेंद्र कुमार, विद्याधर नगर मतदारसंघातून खासदार दिया कुमारी, तिजारामधून खासदार बाबा बालक नाथ, सवाई माधोपूरमधून खासदार किरोरी लाल मीना, सांचोरमधून देवजी पटेल आणि भगीरथ पटेल यांना तिकीट किशनगडचे दिले आहे.

    निवडणूक आयोगाने सोमवारीच राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासोबतच या निवडणुकांचे निकाल इतर चार राज्यांसह ३ डिसेंबरला जाहीर होतील.

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील निवडणुकीची अधिसूचना ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ नोव्हेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर असेल. २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

    Rajasthan Election BJP announced the first list of candidates Seven MPs got tickets

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली