• Download App
    भाजप खासदाराने राजस्थानच्या ऐतिहासिक अमागड किल्ल्यावर फडकावला ध्वज, काँग्रेस सरकारने केली अटक। Rajasthan BJP MP hoists flag over historic Amagadh fort, MP arrested

    भाजप खासदाराने राजस्थानच्या ऐतिहासिक अमागड किल्ल्यावर फडकावला ध्वज, काँग्रेस सरकारने केली अटक

    डॉ. किरोडीलाल मीणा यांना अमागढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती. त्यांनी ध्वज फडकावल्याचे निमित्त करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Rajasthan BJP MP hoists flag over historic Amagadh fort, MP arrested


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : भाजप खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांना राजस्थानच्या जयपूरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मीणा यांनी अमागढ किल्ल्यावर ध्वज फडकवल्याचा आरोप आहे.

    डॉ. किरोडीलाल मीणा यांना आमगढ किल्ल्यात पूजा करायची होती, पण पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यास आधीच बंदी घातली होती.  मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी कॉंग्रेसचे आमदार रामकेश मीणा यांनी यापूर्वी कथितरीत्या अमागढ किल्ल्यावर भगवा ध्वज फाडल्याचा आरोप आहे. यानंतर हे प्रकरण पेटले होते.



    यानंतर पुन्हा भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी अमागढ किल्ल्यावर मीणा समाजाचा झेंडा फडकवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असला तरी अपयशी ठरले. यानंतर पोलिसांना त्यांना अटक करावी लागली. खासदार मीणा यांना अटक झाल्यावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    वसुंधरा राजे यांनी या प्रकरणावर ट्वीट केले आणि लिहिले की, आमगढ किल्ल्याच्या बाबतीत धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या डॉ. किरोडीलाल मीणा जी यांची अटक निंदनीय आहे .डॉ मीणा यांची तत्काळ सुटका करावी.

    Rajasthan BJP MP hoists flag over historic Amagadh fort, MP arrested

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच