विशेष प्रतिनिधी
मुंबई – स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ केला. रेल्वे कौशल्य विकास योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत ५० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. Railway will give training to 50 thousand youth
सुरुवातीला एक हजार उमेदवारांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर आणि यंत्र दुरुस्ती अशा चार विभागांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांमधून दहावीतील गुणांच्या आधारावर, पारदर्शी प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
या कार्यक्रमाबाबत माहिती पुरवण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. अर्ज मागवण्याची सूचना, निवड झालेल्या व्यक्तींची सूची, अंतिम मूल्यांकन, अभ्यासासाठीचे साहित्य आणि इतर तपशील यावर उपलब्ध असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
Railway will give training to 50 thousand youth
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप