• Download App
    रेल्वेला कोरोनाकाळात ३६ हजार कोटींचा अभुतपूर्व तोटा; रेल्वे राज्यमंत्री दानवेंची माहिती Railway affects very badly due to corona

    रेल्वेला कोरोनाकाळात ३६ हजार कोटींचा अभुतपूर्व तोटा; रेल्वे राज्यमंत्री दानवेंची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – रेल्वेला कोरोना प्रादुर्भावाच्या काळात तब्बल ३६ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. Railway affects very badly due to corona

    रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे रेल्वे गाड्याही प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या. या काळात फक्त रेल्वेची मालवाहतूक सुरू राहिली.



    अद्यापही सर्व रेल्वे वाहतूक रुळावर आलेली नाही. दानवे म्हणाले रेल्वेची मालवाहतूक वास्तवात मोठा महसूल जमा करत आहे. प्रवासी रेल्वे प्रवाशांवर व रेल्वे तिकिटाच्या दरावर अवलंबून असल्याने ती तोट्यात असते. त्यामुळे कोरोना काळात रेल्वेला अधिक तोटा झाला. परंतु, मालवाहतूक अखंड सुरू राहिल्याने त्यातून मोठा महसूल मिळाला. कोरोना काळात मालवाहतूक करून रेल्वेने सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

    दानवे म्हणाले की मुंबई- नागपूर एक्स्प्रेस वे सह एक बुलेट ट्रेनही कार्यान्वित केली जाईल, ज्याचे काम वर्तमानात सुरू आहे. तसेच रेल्वेकडून नवी मुंबई ते दिल्ली जोडणारा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर योजना तयार करण्यात आली आहे.

    Railway affects very badly due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Daily Essentials : साबण-बिस्किटपासून तेलापर्यंत सर्व काही महाग होणार; डाबर, HUL सह FMCG कंपन्या किमती वाढवणार; पॅकेजिंग आणि कच्च्या मालाची किंमत वाढली

    China Admits : ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनची पाकिस्तानला मदत; चीन आणि तुर्कस्तान दोघांनी मदत केल्याची कबुली

    बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन होताना मुंबईत मात्र “मुसलमानों का सियासी अजेंडा” पुस्तकाचे प्रकाशन!!