विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना व्यवस्थापनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी आता कोरोना काळात गरीबी वाढल्याच्या अहवालाचा दाखला देत ट्विट करून पंतप्रधानांवर प्रहार केला आहे. गरीबी वाढणे भारत सरकारच्या साथरोग निर्मुलन व व्यवस्थापनशून्यतेचा परिणाम आहे. परंतु आता आपल्याला भविष्याकडे पहावे लागेल. आपल्या देशाच्या पुनर्निर्माणाची सुरवात तेव्हाच होईल, जेव्हा पंतप्रधान आपल्या चुका मान्य करतील आणि कोरोना व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांची मदत घेतील. प्रत्येक गोष्ट नाकारण्याच्या भूमिकेतून काहीही तोडगा निघणार नाही, असा टोलाही राहुल यांनी लगावला आहे. Rahul gandhi targets PM modiji
लसीकरण धोरण, गरिबांना रोख रकमेची मदत यांसारख्या मुद्द्यांवर गेले काही दिवस राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यामातून त्यांनी टीकेचा धार वाढवत न्यायचा सातत्याने प्रयत्न केला आहे. राहुल यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची एकही संधी भाजपनेही सोडलेली नाही. त्यामुळे आता राहुल यांच्या नव्या टीकेला भाजपचे प्रवक्ते कशाप्रकारे पलटवार करून उत्तर देतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Rahul gandhi targets PM modiji
विशेष प्रतिनिधी
- स्विस बँकांमध्ये भारतीयांचे पैसे वाढले तिपट्ट , कोरोना काळातील चित्र; २० हजार कोटी जमा
- सुवेंदू अधिकारी यांच्या विजयला आव्हान, ममता बॅनर्जी आज उच्च न्यायालयात
- मोहम्मद अझहरुद्दीन यांना मोठा धक्का ; हैदराबाद क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवले
- सुंदर पिचई यांचे देशप्रेम, भारताला कोरोना संकटावर मदत करण्यासाठी गुगल करणार ११३ कोटींची मदत
- प्रदीप शर्मा : सचिन वाझेचा एकेकाळचा बॉस, ११३ एन्काऊंटर, शिवसेनेच्या उमेदवारीवर हितेंद्र ठाकूरलाही नडला
- होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, संजय राऊत यांनीच मान्य केले