वृत्तसंस्था
मुंबई : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मधल्या महादेवपुरा मतदारसंघाचे उदाहरण देऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानात एवढा फरक कसा??, असा सवाल करून मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीचे उदाहरण देऊन प्रत्युत्तर दिले.
अजित पवार म्हणाले :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या झाल्या. लोकांनी आपल्याला हवे तसे मतदान केले. बारामती मतदार संघाचे उदाहरण घेतले, तर लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला (सुनेत्रा पवार) 48000 मते कमी मिळाली होती. ते सत्य आम्ही स्वीकारले. त्यानंतर पाचच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या मतदारांनी मला 100000 मते जास्त देऊन निवडून आणले. तोही निकाल आम्ही स्वीकारला. पण काही लोकांना कधी यशच मिळत नाही म्हणून ते वेगवेगळे मुद्दे उकरून काढतात.
मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीतील काही समस्या या विषयावर तोडगा काढायचा अधिकार सरकारचा आणि लोकांचाही नाही, तर तो निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोग मतदार यादीतल्या घोळांचे उत्तर देईल. घोळ असतील तर निस्तरतील, यादीत घोळ नसतील, तर तसे सांगतील. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे.
Rahul Gandhi’s allegations regarding Maharashtra elections, Deputy CM Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी खर्गेंची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांना भोवणार शकुन राणी प्रकरण, निवडणूक आयोगाची नोटीस, पुरावे सादर करण्याचे निर्देश
- American Soldier : रशियासाठी लढणाऱ्या अमेरिकन सैनिकाला पदक; गतवर्षी युक्रेनमध्ये हत्या; आई अमेरिकन गुप्तचर संस्था CIAची उपसंचालक
- Iran Deports : इराण अफगाण निर्वासितांना तपासणीशिवाय बाहेर काढतोय; मुलांना कुटुंबांपासून वेगळे केले, 100 दिवसांत 10 लाख स्थलांतरित