विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पातल्या काही प्रथा परंपरा यांचा उल्लेख राहुल गांधी यांनी जातीच्या आधारावर केला, त्यामुळे अर्थमंत्री यांनी भर लोकसभेत स्वतःच्या डोक्याला हात लावून घेतला. Rahul Gandhi shows a poster of the traditional Halwa ceremony, held at the Ministry of Finance before the Budget session.
हे घडले असे :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू झाली विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधींनी या चर्चेची सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी यांची तुलना महाभारतातल्या कौरवांशी केली. राहुल गांधींनी चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली.
पण त्या पलीकडे जाऊन काही गंभीर मुद्द्यांची चर्चा सुरू करत असताना राहुल गांधींनी बजेटच्या हलवा समारंभाचा उल्लेख केला. त्याचा फोटो लोकसभेत फडकवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशाला हलवा वाटण्याचे हे बजेट केवळ 20 लोकांनी तयार केले आहे. याची माहिती आम्ही माहिती घेतली, तेव्हा यात फक्त एक मायनॉरिटी आणि एक पिछडा आहे, असे समजले. पण त्यांना मागे टाकून दिले. या फोटोत त्यांना घेतलेही नाही, असा दावा करून राहुल गांधींनी बजेटच्या हलवा समारंभात एकही दलित आदिवासी किंवा ओबीसी नाही, असे सांगितले.
वास्तविक राहुल गांधी केंद्रीय अर्थसंकल्पातील काही गंभीर तरतुदींबद्दल बोलत होते. त्यांना जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे रेटायचा होता, पण तो पुढे रेटताना त्यांनी बजेटच्या हलवा समारंभाचा अप्रस्तुत असा उल्लेख केला. शिवाय लोकसभा किंवा राज्यसभेत कुठलाही फलक किंवा फोटो फडकवण्याची परवानगी नसताना हलवा समारंभाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि त्या हसल्या. परंतु राहुल गांधींनी त्याचाही विपरीत अर्थ काढला.
राहुल गांधी म्हणाले :
या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, महिला, छोटे उद्योजक यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. उलट उद्योगविश्वावर एकाधिकारशाही असेलेल्या मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना हमीभावाची खात्री देणाऱ्या कायद्यावरही भाष्य केले नाही.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डोक्याला हात का लावला?
अर्थसंकल्पात देशातील सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. फोटोमध्ये बजेटचा हलवा वाटला जात असल्याचं दिसतंय. या अधिकाऱ्यांत एकही ओबीसी अधिकारी नाही, एकही दलित अधिकारी नाही, एकही दलित अधिकारी नाही. देशात हे काय चाललंय. देशाचा हलवा वाटला जातोय आणि यामध्ये देशातील 73 % जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिनिधीच नाहीत.
सगळा हलवा हेच खात आहेत. फक्त 20 अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. माझ्याकडे त्यांची नावे आहेत. म्हणजेच भारताचा हलवा वाटण्याचे काम या 20 लोकांनी केले. पण या 20 पैकी फक्त एक अधिकारी अल्पसंख्याक तर एक ओबीसी अधिकारी आहे. या फोटोमध्ये तर एकही अधिकारी नाही. म्हणजेच फोटो काढताना तुम्ही त्या दोन अधिकाऱ्यांना मागे ढकललं. म्हणूनच अर्थसंकल्पात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा यावा असे मला वाटत होते. देशातले 95 % भारतीय लोकांना जातीनिहाय जनगणना हवी आहे. कारण या लोकांना आमची भागिदारी किती आहे, हिस्सेदारी किती आहे, हे जाणून घ्यायचे आहे.
अर्थमंत्री हसल्या, ही हसण्याची बाब नाही
राहुल गांधी यांनी ही भूमिका मांडल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हसू आले. हीच बाब लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी सीतारामन यांच्यावरही टीका केली. ‘अर्थमंत्री हसत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. ही हसण्याची बाब नाही. मी जातीनिहाय जनगणनेवर बोलत आहे. जातिनिहाय जनगणना केली तर देशात बदल घडेल, असे राहुल गांधी निर्मला सीतारामन यांना उद्देशून म्हणाले. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर निर्मला सीतारामन यांनीदेखील होकारार्थी मान हलवली.
आम्ही हमीभावाचा कायदा करू
दरम्यान, आम्ही सत्तेत आल्यास जातीआधारित जनगणना करू. आमचे इंडिया सरकार जेव्हा सत्तेत येईल तेव्हा याच संसदेच्या पटलावर आम्ही शेतकऱ्यांना हमीभावाची हमी देणारा कायदा संसदेत संमत करून दाखवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
पण अर्थसंकल्पावरचे काही गंभीर मुद्दे मांडत असताना राहुल गांधींनी अस्थानी बजेट मधल्या हलवा समारंभाचा उल्लेख केला आणि त्यातही जात घुसवली, त्यामुळे निर्मला सीतारामन यांना हसू आले आणि त्यांनी डोक्याला हात लावला.
Rahul Gandhi shows a poster of the traditional Halwa ceremony, held at the Ministry of Finance before the Budget session.
महत्वाच्या बातम्या
- Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!
- कुपवाडात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी, एक शहीद
- आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या, पात्रता काय असावी?
- विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!