• Download App
    रेमडीसीव्हरचे उत्पादन दहापट वाढले, केंद्र सरकारच्या धोरणांना यश; प्लांटची संख्या 20 वरून साठवर पोचली वृत्तसंस्था।Production of Remediver increased tenfold, success of central government policies; The number of plants increased from 20 to 60

    रेमडीसीव्हरचे उत्पादन दहापट वाढले, केंद्र सरकारच्या धोरणांना यश; प्लांटची संख्या 20 वरून साठवर पोचली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: देशात रेमडेसीव्हरचे उत्पादन दहापटीने वाढले आहे. म्हणजेच उत्पादन दररोज 33000 कुपी पासून 3,50,000 कुपीपर्यंत वाढले आहे.
    देशात कोरोना उपचारावर रेमडेसीव्हर इंजेक्शन वापरले जात आहे. परंतु त्याची टंचाई निर्माण झाली होती. केंद्र सरकारने रेमडेसीव्हरचे उत्पादन वाढविण्यासाठी तातडीने पावले उचलली. त्यामुळे उत्पादन वाढले आहे. Production of Remediver increased tenfold, success of central government policies; The number of plants increased from 20 to 60

    रासायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. ते म्हणाले , रेमडेसीव्हर उत्पादक प्लांटची संख्याही महिन्यात 20 वरून 60 पर्यंत वाढली आहे. यामुळे आता राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केंद्र सरकारला रेमडीसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची गरज आता उरलेली नाही. त्यामुळे त्याचे वाटप थांबवले जाईल.



    प्लॅन्टची संख्या 20 वरून 60 झाली आहे. त्यामुळे रेमडीसीव्हरचे विपुल उत्पादन आता देशात होत आहे. एप्रिलमध्ये मार्चच्या तुलनेत दहापट उत्पादन झाले आहे. मागणी पेक्षा अधिक इंजेक्शनचा पुरवठा करता येतो. त्यामुळे केंद्राकडून इंजेनक्शनचा होणारे वाटप आता थांबविले जाईल, असे रासायनिक आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे टंचाई निर्माण होऊ नये यासाठी 50 लाख डोसची अतिरिक्त साठा करून ठेवला जाईल. तो लागेल तेव्हा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल.

    सात भारतीय उत्पादकांना रेमॅडेसीव्हर तयार करण्यासाठी परवाना मिळाला आहे. कोविड 19 अंतर्गत केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीयअडत केली होती. त्यात गेल्या 2 दिवसांत भारताला विविध देशांकडून १२ लाख फविपिरवीर गोळ्या आणि 9.9 लाख रेमडीसीव्हर वायल्सही मिळाल्या आणि त्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आल्या आहेत.

    Production of Remediver increased tenfold, success of central government policies; The number of plants increased from 20 to 60

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने म्हणाले- दावे खरे, तर राहुल यांनी सही करावी; अन्यथा देशाची माफी मागावी

    भारतीय हवाई दल प्रमुखांनी ट्रम्पच्या जखमेवर मीठ चोळले; भारताने पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे सांगितले!!