Priyanka Gandhi : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी केला. परीक्षा रद्द करावी किंवा गर्दीच्या परीक्षा केंद्रांवर मुलांनी जाऊ नये, अशी व्यवस्था केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. Priyanka Gandhi Lashes Out CBSE, said – exams Should Be Cancelled in Corona period
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शुक्रवारी केला. परीक्षा रद्द करावी किंवा गर्दीच्या परीक्षा केंद्रांवर मुलांनी जाऊ नये, अशी व्यवस्था केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, “कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपल्या देशाला घेरले आहे. अशा परिस्थितीत परीक्षेसाठी दबाव आणल्यास मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. आमच्या शिक्षण व्यवस्थेने आपल्या भूमिकेत मोठा बदल घडवून आणणे गरजेचे आहे. मुलांच्या संदर्भात फक्त संमेलने व चर्चासत्रांमध्ये चर्चा न करता संवेदनशीलता व अनुकंपा दाखवणे आवश्यक आहे. प्रियांकांनी आरोप केला की, “सध्याच्या परिस्थितीत मुलांना परीक्षेला बसण्यासाठी मजबूर करण्यास सीबीएसईसारखे बोर्ड पूर्णपणे जबाबदार आहेत.”
त्यांनी सरकारला आग्रह केला की, “बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा त्यांचे वेळापत्रक बदलावे किंवा मुलांना कोणत्याही गर्दीच्या परीक्षा केंद्रावर जावे लागू नये, अशा पद्धतीने परीक्षा घ्यावी.”
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्ड परीक्षांशी संबंधित सुधारित तारखेनुसार, दहावीच्या परीक्षा 4 मे ते 7 जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत, तर 12वीच्या परीक्षा 4 मे ते 15 जूनदरम्यान घेण्यात येतील.
Priyanka Gandhi Lashes Out CBSE, said – exams Should Be Cancelled in Corona period
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तराखंडचा मोठा निर्णय, बद्रीनाथसह 51 मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त; विहिंपने म्हटले – इतर राज्यांनीही असे करावे अन्यथा आंदोलन
- PM मोदी म्हणाले, ‘कूचबिहारची घटना दु:खद, दीदी – तृणमूलची मनमानी चालणार नाही, दोषींना शिक्षा व्हावी’
- WATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल!
- कुचबिहारमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांवर हल्ला; निवडणूक हिंसाचारात ४ ठार; निवडणूक आयोगाने रिपोर्ट मागविला; तृणमूळच्या नेत्यांचा सुरक्षा दलांवरच आरोप
- आरोग्यमंत्र्यांच्या दाव्यानंतरही रेमडीसीवर मिळेना, नाशिकमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर