• Download App
    Droupadi Murmu राष्ट्रपती म्हणाल्या- प्रलंबित खटले न्यायव्य

    Droupadi Murmu : राष्ट्रपती म्हणाल्या- प्रलंबित खटले न्यायव्यवस्थेसाठी आव्हान; रेपसारख्या प्रकरणांत न्यायास उशिरामुळे विश्वास ढळतो

    Droupadi Murmu

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्रलंबित खटले आणि अनुशेष (बॅकलॉग) हे न्यायव्यवस्थेसमोर मोठे आव्हान असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी रविवारी सांगितले. बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा निर्णय एक पिढी उलटून गेल्यावर येतो, तेव्हा न्यायप्रक्रियेत संवेदनशीलता उरलेली नाही, असे सर्वसामान्यांना वाटते.

    राष्ट्रपती मुर्मू यांनी रविवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या समापन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्या बोलत होत्या.

    सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वजाचे आणि चिन्हाचे प्रकाशनही करण्यात आले.



    मुर्मू म्हणाल्या- न्यायाचे रक्षण करणे ही सर्व न्यायाधीशांची जबाबदारी

    मुर्मू म्हणाल्या की, न्यायालयांमध्ये तात्काळ न्याय मिळण्यासाठी खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्याची संस्कृती संपवली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न झाले पाहिजेत. न्यायाचे रक्षण करणे ही या देशातील सर्व न्यायाधीशांची जबाबदारी आहे.

    राष्ट्रपती म्हणाल्या की, सामान्य माणसाची कोर्टरूममध्ये येताच तणावाची पातळी वाढते. त्याला ‘ब्लॅक कोट सिंड्रोम’ असे नाव दिले आणि त्याचा अभ्यास करावा असे सुचवले. न्यायव्यवस्थेत महिला अधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

    राष्ट्रपती म्हणाल्या- न्याय मिळण्यास किती विलंब योग्य आहे याचा विचार करण्याची गरज

    राष्ट्रपती म्हणाल्या की, गावातील लोक न्यायव्यवस्थेला दिव्य मानतात कारण त्यांना तिथे न्याय मिळतो. एक म्हण आहे – भगवान के पास देर है, पर अंधेर नही. पण किती दिवस? याचा विचार करायला हवा. न्याय मिळेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरून हास्य नाहीसे झालेले असते आणि अनेक प्रकरणांमध्ये त्यांचे आयुष्यही संपलेले असते. याचा खोलवर विचार करण्याची गरज आहे. त्या म्हणाल्या की, अनेक घटनांमध्ये अनेक लोक गुन्हे करूनही मोकळेपणाने फिरत राहतात, तर पीडित व्यक्ती भीतीने जगत असतात, ही आपल्या सामाजिक जीवनातील एक खेदजनक बाब आहे. महिलांची परिस्थिती वाईट आहे कारण आपला समाज त्यांना साथ देत नाही.

    President said- Pending cases challenge for judiciary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य