सामाजिक न्याय हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असंही म्हणाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Murmu ) म्हणाल्या की, सामाजिक न्याय हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्या म्हणाल्या की, मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एससी, एसटी आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी अनेक अभूतपूर्व पुढाकार घेतले आहेत. राजकीय लोकशाहीची सातत्यपूर्ण प्रगती ही सामाजिक लोकशाही बळकट करण्याच्या प्रगतीची साक्ष देते, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या, संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या आनंदाच्या प्रसंगी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते. मी विशेषतः सशस्त्र दलातील त्या शूर सैनिकांचे अभिनंदन करते जे आपला जीव धोक्यात घालूनही आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करतात.
क्रीडा जगत हे देखील एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्या देशाने गेल्या दशकात बरीच प्रगती केली आहे. सरकारने क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट प्रयत्न केले. मी खेळाडूंच्या समर्पण आणि मेहनतीचे कौतुक करते. त्यांनी तरुणांना प्रेरणा दिली आहे. असंही राष्ट्रपती म्हणाल्या आहेत.
President Murmu Said India will become the third largest economy
महत्वाच्या बातम्या
- Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल!
- Saket Gokhale : ‘टीएमसी’ खासदार साकेत गोखले यांच्या अडचणीत वाढ!
- Arvind Kejriwal : न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ!
- S Jaishankar :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत एस जयशंकर यांचे वक्तव्य, म्हणाले…